Monday, 17 July 2017

नाशिक मध्ये पुराचे मोजमाप करण्यासाठी गंगा गोदावरी च्या पात्रातील एक मारुतीचा उल्लेख केला जातो त्या मारुतीचे नाव काय ?

Daily Quiz # २६५

नाशिक मध्ये पुराचे मोजमाप करण्यासाठी गंगा गोदावरी च्या पात्रातील एक मारुतीचा उल्लेख केला जातो त्या मारुतीचे नाव काय ?

उत्तर :-  दुतोंड्या मारुती


रामकुंडाजवळील हा मारुती 25 फुट उंच नदी पात्रात  नाशिक व पंचवटी कडे तोंड करुन उभा आहे..
गोदावरी चे पुराचे पाणी मोजण्याचे नाशिकरांचे एक खास प्रमाण आहे..मारुतीच्या पायाला ..घुडध्याला..कमरेला..छातीला पाणी लागले म्हणजे पुर यायला सुरवात झाली दुतोंड्या मारुती पूर्णपणे बुडाला म्हणजे पुर आला..लोक विचारतांत मारुतीच्या कुठपर्यत पाणी आहे..यावरुन पुराच्या पाणाचा अंदाज करता येतो..
नाशिकमधील गोदावरीलाचा पूर ओसरला, दुतोंड्या मारुती पाण्याबाहेर
नाशिकमधील पूरस्थिती लक्षात घ्यायची असेल तर दुतोंड्या मारूती त्याचा मापदंड मानला जातो.
 अख्खा मारुती जर पाण्यात बुडाला तर धोक्याची परिस्थिती निर्माण झाली असं सांगितलं जातं. यापूर्वी 1972च्या पुरात दुतोंड्या मारूती पुराच्या पाण्यात अख्खा बुडून पुराचं पाणी नारो शंकराच्या मंदिरावरील घंटेला लागलं होतं. अशी आठवण गोदावरीला पूर आला की आवर्जून सांगितली जाते.⁠⁠⁠⁠





Sunday, 16 July 2017

छत्रपती संभाजी राजांच्या सर्वात मोठया बहिणीचे नाव काय होते?

Daily Quiz # २६४

छत्रपती संभाजी राजांच्या सर्वात मोठया बहिणीचे नाव काय होते?

उत्तर :- सखुबाई निंबाळकर(भोसले)

छ. शिवाजी महाराज  आणि सईबाई राणीसरकार यांना, एकूण चार मुले झाली. 
३ मुली आणि १ मुलगा. 
मुलीमध्ये - सखुबाई (निंबाळकर), राणूबाई (शिर्के), अंबिकाबाई (महाडिक) ह्या होत्या 
तर शंभूराजे (छ.संभाजी महाराज) हे सर्वात लहान सुपुत्र होते. 

सईबाई आणि शिवराय यांची मुलगी सखुबाई यांचा विवाह सईबाईंचा भाऊ बजाजी नाईक निंबाळकर याच्या मुलाशी(महादजी निंबाळकर)  झाला.

खालील माहितीत सर्व मंडीळीची नावे एकेरी आहेत, कैफियत मध्ये जसे आहे तसे देत आहोत

मुंबई, सातारा जिल्ह्यांतील एक जहागीर. येथील जाहागीरदाराचें आडनांव निंबाळकर. मुख्य गांव फलटण. जहागिरीच्या उत्तरेस नीरा; पूर्वेस सोलापूर जिल्हा; दक्षिणेस माण, व खटाव तालुके; पश्चिमेस वाई व कोरेगांव हे तालुके. एकदंर गांवे ७२ आहेत क्षेत्रफळ ३९७ चौरस मैल व लोकसंख्या (१९२१) ५५९६६. उत्पन्न २ लाख रु. इंग्रज सरकारास ९६०० रु. खंडणी जाते. जहगिरीतींल उत्तरेचा नीराथडीचा प्रांत सुपीक व दक्षिणेचा डोंगराळ आहे. पाऊस फार कमी पडतो. हवा उष्ण आहे. ज्वारी, बाजरी, तूर, हरभरा ही मुख्य पिंके होत. नीरा व बाणगंगा या मोठ्या नद्या. फलटण गावीं रामनवमीचा मोठा उत्सव होतो. येथें मानभावांचे एक जुने देवस्थान आहे. येथें एक हायस्कूल, दवाखाना व म्युनिसिपालिटीही आहे.
इतिहास- महाराष्ट्रांतील राजघराण्यांत फलटणच्या निंबाळकराचें घराणे फार जुनें असून सुमारे सहा सातशें वर्षें तें राज्योपभोग घेत आहे. धारच्या परमार रांजावर दिल्लीच्या सुलतानांनीं पुन्हां पुन्हां हल्ले केले, त्या धामधुमींत निंबराज परमार नांवाचा एक पुरुष दक्षिणेंत फलटणनजीक शंभुमहादेवाच्या रानांत सन १२४४ च्या सुमारास येऊन राहिला. निंबराज ज्या गावीं राहिला त्यास निंबळक आणि त्यावरून त्याच्या वंशास निंबाळकर अशें नाव पडले. निंबराजाच्या वंशजांनी पुढे फलटण हें गाव वसविलें आणि तेथें ते वतन संपादून राहूं लागले. महंमद तुघ्लखाच्या वेळेस ह्यांस 'नाईक' हा किताब व फलटणची देशमुखी मिळाली. पुढें आदिलशाहींत निंबाळकराचें महत्त्व विशेष वाढलें. निंबराजापासून चवदावा पुरुष वणंगपाळ उर्फ जगपाळराव म्हणून झाला, त्याच्या पूर्वीची माहिती उपलब्ध नाहीं.
जगपाळराव हा शूर व फौजबंद होता. स.१५६९ च्या सुमारास तो फटलणचा कारभार पाहूं लागला.हिंगणी बेरडीचे भोंसले दरसाल चैत्रांत शंभुमहादेवाच्या यात्रोस जात. रस्त्यात त्यांचा मुक्काम फलटणास निंबाळकरांकडे होई. बाबाजी भोंसल्याचे दोघे मुलगे मालोजी व विठोजी हे जगपाळरावाचे समवयीच होते. भोसलें बंधूची इभ्रत, ज्वानी व हिंमत पाहून त्या उभयतांचा ॠणानुबंध वाढला. जगपाळराव आजूबाजूस आपला प्रदेश वाढवीत होता, त्या कामीं त्यास मालोजी व विठोजीचा चांगला उपयोग झाला. असे सांगतात कीं, स.१५९०-९२ च्या सुमारास जगपाळरावाची फौज कोल्हापुरकडील कांहीं प्रांत जिकीत असतां, त्याजवर आदिलशहाची फौज चालून आली. पुढें लढाई झाली, तींत भोसलेबंधूंनीं शौर्य प्रगट करून जगपाळरावाची बाजू संभाळिली. ह्यामुळे त्या उभयतांचा स्नेह वृध्दिंगत झाला.पुढें भोसल्यांचा भाग्योदय झालेला पाहून जगपाळरावानें आपली बहीण मालेजीस दिली. हीच शहाजीची आई दीपाबाई होय. पुढें जगपाळरावाच्या मदतीनें जिजाबाईचे लग्न शहाजीशीं झाले. शहाजीनें निमाजशाहीच्या तर्फेने शहाजहानशीं युद्ध केलें, त्यांत जगपाळरावानें शहाजीस मदत केली. ह्या लढाईंतच जगपाळराव स.१६२९ त अहंमदनगरजवळ मरण पावला.
पश्चात त्याचा प्रौढ मुलगा मुधोजीराव (दुसरा) फलटणचा अधिकारी झाला. त्याला दोन बायका असून वडील बायकोला साबाजीराव व जगदेवराव, आणि धाकटीला बजाजी राव व सईबाई अशीं मुलें होती. ह्या सावत्र मुलांत तंटे लागून ते विकोपास गेले. साबाजी व जगदेव हे दोघे घर सोडून मातुश्रीसह विजापुरास गेले. तेथें दरबारांत खटपट केल्यावर त्यांस दहिगांव व भाळवणी हे दोन गांव स्वतंत्र तोदून मिळले (१६३४). अशा रीतीनें निंबाळकरांच्या तीन स्वतंत्र शाखा झाल्या. ह्या गृहकलहामुळें जहागिरांचे नुकसान झालें. मुधोजीराव आजूबाजूस पुंडावे करूं लागला म्हणून त्यावर आदिलशहाची फौज चालून आली; त्याचा पराभव होऊन, आदिलशहानें त्यास बंडखोर ठरवून सातारच्या किल्ल्यावर कैदेत ठेविलें (स.१६३१). येथें तो सात वर्षें होता. त्या मुदतीत फलटणची जहागीर जप्त होती. मुधोजीनें आपली धाकटी बायको व तिची मुलें बजाजी व सईबाई यांस, आपल्याजवळ बोलावून घेतलें. पुढें शहाजी विजापूरच्या नोकरींत राहिल्यावर त्यानें आपलें वजन खर्च करून मुधोजीची (१६३८) सुटका करविली. ह्या उपकारामुळें मुधाजीनें आपली मुलगी शिवाजीस दिली. (१६३९).
शिवाजीनें पुढें जो स्वतंत्र होण्याचा उपक्रम चालविला त्यास मुधोजीचें साहाय्य होते ही गोष्ट  विजापूरदरबारास खपत नव्हती. शिवाय मुधोजीच्या मनात असे होतें कीं, आपल्या पश्चात फलटणचा कारभार बजाजीस मिळावा. ह्या गोष्टीस त्याचे वडील मुलगे कबूल नव्हते. ते विजापुरची मदत घेऊन मुधोजीवर चालून आले. शिरवळनजीक भोळी येथें लढाई होऊन मुधोजी एका वडाच्या झाडाखाली पुत्राच्या हातून मारला गेला, त्यास बापमारीचा वड असें म्हणतात (इ.स.१६४४). ह्या लढाईंत बजाजीस कैद करून विजापुरास नेलें. तेथे बापाच्या अपराधाबद्दल त्यास जिवें मारण्याची आज्ञा झाली. परंतु आदिलशाहाच्या मुलीनें त्याला बाटवून त्याच्याशीं लग्न केल्याने त्याची शिक्षा रद्द झाली. बजाजी काहीं काळ विजापुरी राहिल्यावर देशमुखीनें फर्मान घेऊन फलटणास आला (१६५१). फलटणास अद्यापि बजाजीची समाधि (घुमट) आहे. त्यास पुढें जिजाबाईनें शुंभुमहादेवाच्या देवळांत प्रायश्चित्त देऊन परत जातींत घेतले आणि त्याचा मुलगा महादजी ह्यास शिवाजीची मुलगी सखूबाई दिली.
इ.स.१६६१ च्या पावसाळयानंतर आदिलशहा कर्नाटकांतील बंडें मोडण्याकरितां त्या प्रांतीं गेला तेव्हा बजाजी त्याच्याबरोबर होता. इ.स. १६६५ (नोव्हेंबर) त मोंगल व शिवाजी यांचें संयुक्त सैन्य विजापुरच्या मोहिमेवर निघालें. तेव्हां त्यांनीं प्रथम बजाजीपासून फलटण, व ताथवडयाचा किल्ला घेतला. हीं ठाणीं पुढें १० वर्षांनीं बजाजींनें मोंगलांपासून परत घेतलीं. बजाजीची मदत शिवाजीस गुप्तपणे असे. बजाजीच्या मुसुलमान बायकोस मूल झाल्याचें दिसत नाहीं. हिंदु स्त्री सावित्रीबाई हिला महादजी, मुधोजी व वणगोजी (तिसरा) अशीं मुलें होतीं. महादजी हा शिवाजीचा जांवई असून त्याचा एक सरदार होता. तो बहुश: कर्नाटकाकडे असे. संभाजीला त्याची चांगली मदत झाली. संभाजीचा वध झाल्यावर औरंगझेबानें या नवराबायकोस पकडून ग्वाल्हेरीच्या किल्ल्यावर हयातीपर्यंत कैदेत ठेविलें. शिवाजीनें मोजे वाल्हें (जिल्हा पुणें) येथील पाटिलकी जांवयास आंदण दिली होती. महादजीचा पुत्र बजाजी (दुसरा) हा स. १७७४ पर्यंत हयात होता. महादजीचा धाकटा भाऊ मुधोजी. त्याचा मुलगा बजाजी (तिसरा) यास राजाराम छत्रपतीची मुलगी सावित्रीबाई दिली होती पहिला बजाजी स१६७६ च्या सुमारास वारला त्यावर त्याचा तिसरा पुत्र वणगोजी (१६७६-९३) गादीवर आला; याची विशेष माहिती आढळत नाहीं. त्याच्यानंतर जानोजीस (१६९३-१७४८) गादी मिळाली. हा पेशव्यांस मिळून मिसळून वागे. त्याचा मुलगा मुधोजी (तिसरा-१७४८-६५) यानें (तिस-या) मालोजांस दत्तक घेतलें. मुधोजीच्या पश्चात दत्तकाबद्दल भांडण होऊन, सखारामबापू यांच्या सल्ल्यानें पेशव्यानीं फलटणास जप्ती पाठविली. त्या वेळीं मुधोजीच्या सगुणाबाई नांवाच्या स्त्रीनें जप्तीवाल्यांशी लढाई केली तेव्हा पेशव्यानीं जहागीर जप्त करून ती मुधोजी बिन बजाजी एका भाऊबंदाकडे चालविली. बाई त्राग्यानें ६ वर्षें बालेघाटी जाऊन राहिली. पुढें जेजुरीस पुन्हां दत्तकाची चौकशी होऊन व पेशव्यानां लाख रुपये नजर देऊन मालोजीनें जहागिरीचा ताबा मिळविला (१७७४). मालोजी हा पेशव्यांबरोबर चाकरीस असे व जहागिरीचा कारभार सगुणाबाई करीत असें. या घराण्यांत ही बाई फार प्रख्यात झाली. मालोजी हा कर्नाटकांत हरिपंततात्याच्याबरोबर असतां वाख्यानें मेला (१७७७). त्यानें जानराव यास दत्तक घेतलें होतें. जानराव हा बापाप्रमाणेंच पेशव्यांच्या सैन्यांत असे व सगुणाबाईच जहागिरीचा कारभार पाही. ती स.१७९१ त वारल्यावर, जानराव स्वत: कारभार पाहूं लागला. तो स. १८२५त वारला. त्यावर त्याची बायको साहेबजीबाई हिनें स.१८५३ पर्यंत कारभार केला. तिनें मुधोजीराव बापूसाहेब यांनां १८४० त दत्तक घेतलें. त्यानां स. १८६० त संस्थानचा अधिकार मिळाला. त्यानीं पुष्कळ वर्षें राज्य केलें. त्यानीं संस्थानांत ब-याच सुधारणा केल्या. फलटणास पाणीपुरवठयाची योजना केली, मोफत शिक्षण सुरू केलें. हल्ली (१९२५ नोव्हेंबर) त्यांचे दत्तक चिरंजीव श्री मालोजीराव नानासाहेब हे गादीवर आहेत. 

(इसं; फलटणची हकीकत; वाड-कैफियती; डफ; म. रि. म. वि. २)⁠⁠⁠⁠

लग्नानंतरची नावे (शिवरायांच्या मुली) :-

1) सखुबाई निंबाळकर
२) राणूबाई जाधव, 
३) अंबिकाबाई महाडिक 
४) दिपाबाई (यांची थोडी सुद्धा माहिती नाही) पण नाव बऱ्याच वेळा येते शंभू महाराज काळात 
५) राजकुंवरबाई शिर्के
६) कमलबाई पालकर⁠⁠⁠⁠

शिवरायांचे पहिले चरित्र लिहीणारा परकीय कोण? त्याने कोणत्या नावाने व कधी लिहीले?

Daily Quiz # २६३

शिवरायांचे पहिले चरित्र लिहीणारा परकीय कोण? त्याने कोणत्या नावाने व कधी लिहीले?

कॉस्मे दी गार्डा'

छत्रपती शिवरायांबद्दल अफाट आकर्षण,प्रचंड प्रेम आणि नितांत आदर असणारा हा व्यक्ती मराठी हि नव्हता आणि भारतीय सुद्धा नव्हता. मुळचा पोर्तुगीज असणार्या या व्यक्तीच नाव होतं 'कॉस्मे दी गार्डा'. गोव्याचा मार्मागोवा भागात हा राहत होता आणि एक प्रशासकीय अधिकारी सुद्धा होता.

छत्रपती शिवरायांच्या मृत्युच्या नंतर फक्त १५ वर्षांनी म्हणजे १६९५ साली कॉस्मे दी गार्डा ने शिवचरित्र लिहून पूर्ण केले, या चरित्राचे पोर्तुगीज नाव 'Vida e accoens do famoso e felicissimo Sevagy' असे होते, याचा अर्थ इंग्रजीमध्ये 'Celebrated life of famous Shivaji the Great',तर मराठी मध्ये 'सर्वप्रसिध्द असणार्या शिवाजी महाराजांची जीवनगाथा ' असा होतो⁠⁠⁠⁠


जुन्नरच्या पश्चिमेला एका घाटमार्गाच्या तोंडाशी हा दगडी रांजण ठेवलेला आहे. हा घाटमार्ग कुठला आणि हा घाटमार्ग कोणी खोदून काढला ?

Daily Quiz # २६२

जुन्नरच्या पश्चिमेला एका घाटमार्गाच्या तोंडाशी हा दगडी रांजण ठेवलेला आहे. हा घाटमार्ग कुठला आणि हा घाटमार्ग कोणी खोदून काढला ?



उत्तर : नाणेघाट, सातवाहन राजांनी

इ.स. पूर्व पहिल्या शतकापासून सातवाहनांची राजवट महाराष्ट्रावर होती. अनेक नामवंत राजे या घराण्यात होऊन गेले. त्यांचा इतिहास हा त्यांनी खोदलेल्या लेणी आणि त्यांची सापडलेली नाणी यावरून माहिती होतो. "प्रतिष्ठान' म्हणजे आजचे पैठण ही त्यांची राजधानी होती असे सांगितले जाते. सातवाहनांच्या काळात परदेशाशी मोठ्या प्रमाणात व्यापार चालत असे. बराचसा व्यापार हा समुद्रमार्गे असल्यामुळे विविध बंदरे महाराष्ट्रात विकसित झाली होती. "शूर्पारक' म्हणजेच आजचे "नालासोपारा' हे त्यातलेच एक महत्त्वाचे बंदर. प्रतिष्ठानपासून ते शूर्पारक या बंदरापर्यंत जाणारा महत्त्वाचा व्यापारी मार्ग जुन्नर तालुक्यातून जात असे. याच मार्गावर जुन्नरच्या पश्चिमेला सातवाहन राजांनी एक सुंदर असा घाटमार्ग खोदून काढला. नाणेघाट हे त्याचे नाव. अत्यंत प्रसिद्ध असा हा नाणेघाट आजही आवर्जून पाहावा असा आहे. जनावरांच्या पाठीवरून माल लादून तो या घाटाने चढवला-उतरवला जाई. तिथून पुढे तो बैलगाडीने योग्य त्या स्थळी पोचवला जात असे. याच नाणेघाटात सातवाहनांनी एक अद्वितीय कलाकृती कोरून ठेवली आहे. या घाटाच्या तोंडाशी एक प्रशस्त गुहा असून, त्याच्या तीनही भिंतींवर ब्राह्मी लिपीमध्ये शिलालेख कोरलेला आहे. सातवाहनांचा राजा सातकर्णी याची पत्नी राणी नागनिका हिने हे लेणे खोदून घेतले आणि तिच्या कारकिर्दीतील घटनांची नोंद या शिलालेखात केली आहे. पतीच्या मृत्यूनंतर या राणीने विविध यज्ञ केले. त्यात मोठा दानधर्म केला, तो दानधर्म "कार्षापण' या चलनात केल्याची महत्त्वपूर्ण नोंद या शिलालेखात नोंदलेली आहे. तसेच या लेण्यात राणी नागनिका, तिचा पती सातकर्णी आणि राणीचे वडील यांचे पुतळे केलेले होते. ते मात्र केव्हाच नष्ट झाले असले, तरीसुद्धा त्या पुतळ्यांच्या डोक्यावर तो कोणाचा पुतळा आहे याची नावे ब्राह्मी लिपीत कोरलेली आजही वाचायला मिळतात. थोर इतिहास संशोधिका (कै.) डॉ. शोभना गोखले यांनी या संपूर्ण शिलालेखाचा सुंदर अभ्यास करून सातवाहन घराण्याचा मोठा इतिहास उजेडात आणायचे काम केले. जवळजवळ 300 वर्षे या राजघराण्याने महाराष्ट्रावर राज्य केले होते. यांच्या काळात व्यापार उद्योग भरभराटीला आले होते. या सगळ्याची नोंद आपल्याला या नाणेघाटात बघायला मिळते. या घाटामुळे महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास समजण्यास अत्यंत मोलाची मदत झालेली आहे. याच घाटाच्या तोंडाशी एक दगडी रांजण आजही पाहायला मिळतो. "जकातीचा रांजण' असे यास म्हटले जाते. तसेच इतरही काही गुहा आणि विशेषतः प्रवाशांसाठी पाण्याची सोय व्हावी म्हणून विविध टाकी खोदलेली पाहायला मिळतात. अत्यंत रम्य परिसर लाभलेले हे ठिकाण म्हणजे आपल्या प्राचीन इतिहासाचा अमोल ठेवाच म्हणावा लागेल.⁠⁠⁠⁠

गावच्या वेशीजवळ, मंदिरांच्या प्रांगणात, किल्ल्यांच्या वाटांवर काही शिळाशिल्पे आढळतात. त्यावर युद्धातील प्रसंग तसेच धारातीर्थी पडलेले वीर आढळतात. या शिल्पांना काय म्हणतात ?

Daily Quiz # २६१

गावच्या वेशीजवळ, मंदिरांच्या प्रांगणात, किल्ल्यांच्या वाटांवर काही शिळाशिल्पे आढळतात. त्यावर युद्धातील प्रसंग तसेच धारातीर्थी पडलेले वीर आढळतात. या शिल्पांना काय म्हणतात ?

उत्तर : वीरगळ

महाराष्ट्रात बर्याच ठिकाणी गावच्या वेशीजवळ, मंदिरांच्या प्रांगणात, किल्ल्यांच्या वाटांवर काही शिळाशिल्पे आढळतात. त्यावर युद्धातील प्रसंग तसेच धारातीर्थी पडलेले वीर आढळतात. तेच हे वीरगळ.

वीरगळ हा शब्द वीर(संस्कृत) आणि कल्लू (कन्नड) अशा दोन शब्दांचा मिळून झाला आहे. कल्लू म्हणजे दगड अथवा शिळा. वीरपुरुषाची शिळा म्हणजेच वीरगळ.

हे वीरगळ महाराष्ट्रात आणि कर्नाटकात बहुसंख्येने दिसतात.
पूर्वीच्या प्रथेप्रमाणे एखाद्या वीरपुरुषाने गावावर आलेल्या परचक्राचा सामना केला, गाईगुरांना पळवून लावणार्यांपासून त्याचे संरक्षण केले, दरोडेखोरांकडून गावाचे संरक्षण केले आणि हे करता करता लढाईत त्याचे प्राणोत्क्रमण झाले तर त्याचे स्मारक ऊभारण्यात येई.

उभट, आयताकृती दगड, त्याच्या चारही बाजूंना चौकटी कोरलेल्या, वर घुमटी अशी याची रचना. चारी बाजूंच्या चौकटींमध्ये युद्धाचे प्रसंग कोरलेले, एका चौकटीवर आडवा पडलेला वीर आणि घुमटीवर चंद्र सूर्य कोरलेले अशी यांची सर्वसाधारण रचना.

वीरगळांवर वीराचे नाव कोरण्याची प्रथा नाही किंवा युद्धाची माहिती लिहिलेले शिलालेखही त्यावर आढळत नाहीत.

काही वीरगळांवर सागरी युद्धेही कोरलेली आढळतात. मुंबईतल्या एका वीरगळावर जहाजांमधील युद्ध कोरलेले आहे. हा वीरगळ उत्तर कोकणातल्या शिलाहार राजवटीमध्ये खोदला गेला.

महाराष्ट्रातील बहुतांश वीरगळ हे शिलाहारकाळ आणि यादवकाळात मोठ्या प्रमाणावर उभारले गेले.

१. रतनवाडीतील अमृतेश्वर मंदिराच्या बाजूला असणारा वीरगळ
२. राजमाचीच्या भैरवनाथ मंदिराच्या बाजूस असणारा वीरगळ
३. माहुली किल्ल्यावरील भग्नावस्थेतील वीरगळ

गधेगाळ किंवा हत्तीगाळ

ही शिळाशिल्पे बहुतेक वेळा शापवाणी (कर्स मेकर्स) करण्यासाठी निर्मिली गेली.
वीरगळांप्रमाणेच यांचा उगम शिलाहारकालीन. यादवकाळातही हे गधेगाळ कोरले गेले.

वीरगळांसारखीच यांची रचना. उभट आयताकृती दगड आणि वर घुमटी. मात्र या गधेगाळांवर शिलालेख आढळतात. मुख्य म्हणजे हे शिलालेख देवनागरीत आहेत ते ही मराठी भाषेत.

घुमटीवर चंद्र सूर्य कोरलेले, त्याखालच्या चौकटीवर शिलालेख कोरलेला. वर काही मंगलवचने तर खालच्या बाजूस अभद्र वचने कोरलेली. व त्या खाली अजून एक शिल्प कोरलेले. त्या शिल्पात स्त्रीचा गाढवाबरोबर किंवा हत्तीबरोबर संकर दाखवलेला. हे गाढव शिल्प म्हणजे गधेगाळ व जिथे हत्ती असेल ते हत्तीगाळ.

काही वेळा ह्या असभ्य शिल्पांबरोबरच वरच्या बाजूस शिवलिंगाची पूजेचे शिल्प पण कोरले गेले आहे.

नागाव, अलिबाग येथील अक्षी गावातील गधेगाळ शिल्प सर्वात प्राचीनतम मानले जाते. डॉ. शं. गो. तुळपुळे यांनी याचे संपूर्ण वाचन केले.
गीं सुष संतु। स्वस्ति ओं। पसीमस- मुद्राधीपती।
स्त्री कोंकणा चक्री- वर्ती। स्त्री केसीदेवराय।
महाप्रधा- न भइर्जु सेणुई तसीमीनी काले प्रव्रतमने।
सकु संवतु: ९३४ प्रधा- वी सवसरे: अधीकू दीवे सुक्रे बौ- लु।
भइर्जुवे तथा बोडणा तथा नऊ कुवली अधोर्यु प्रधानु।
महालषु- मीची वआण। लुनया कचली ज-

शके ९३४ अर्थात इ.स. १०१२ मधला हा संकृत मिश्रीत मराठी शिलालेख मराठीतील सर्वात आद्य लेख आहे. श्रवणबेळगोळच्या गोमटेश्वराच्या सर्वमान्य आद्यलेखापेक्षाही जुना.
ह्याचा अर्थ असा-
कल्याण होवो. पश्चिम समुद्राधिपती श्री. कोकण चक्रवर्ती श्री. केसीदेवराय याचा महाप्रधान भइर्जू सेणुई याने शक संवत ९३४ प्रभव संवत्सर अधिक कृष्ण पक्ष शुक्रवार या दिवशी देवीच्या बोडणासाठी नऊ कुवली धान्य नेमून दिले. जगी सुख नांदो.
ह्या खालच्या तीन ओळींत मात्र अभद्र वचन कोरलेले आहे.
हे शासन कुणी भंग करील तेहाची माय गाढवे झबिजे
व त्या खालच्या शिल्पामध्ये गाढव व स्त्रीचा संकर दाखवलेला आहे.
ह्या शिलालेखाच्या वरील भागात चंद्र सूर्य कोरलेले असून मधल्या ओळी मात्र आता बर्याचशा पुसट झालेल्या आहेत.

रतनगडाच्या पायथ्याशी रतनवाडीतल्या अमृतेश्वर मंदिराच्या प्रांगणात एक हत्तीगाळ जमिनीत अर्धवट रोवलेला आढळतो. घुमटीवर चंद्र-सूर्य कोरलेले असून मधल्या चौकटीत शिवपिंडीचे पूजन दाखवले आहे. तर खालच्या बाजूस हत्तीबरोबर संकर दाखवला आहे. शिलालेखाच्या ओळी पूर्णपणे बुजलेल्या आहेत.
जो कोणी ह्या शिवलिंगाच्या पूजेचा अव्हेर करेल त्याची अशी अवस्था होईल असा ह्या शिल्पाचा अर्थ काढता येतो.
हे शिल्प शिलाहार झंझ राजाच्या कारकिर्दीत घडवले गेले असावे (साधारण १० वे शतक) कारण अमृतेश्वराच्या मंदिराचा कर्ताही तोच आहे. मंदिराशेजारीच काही वीरगळ पण आहेत.

अंबेजोगाई-वेळापूर इथल्या गधेगाळामध्ये संस्कृतमध्ये शापवाणी कोरलेली आहे.
स्वदत्तां परदत्तां वा यो हरेत वसुंधरा |
षष्टिं वर्ष सहस्त्रानि विष्ठायां जायते कृमि: ||
स्वकीय किंवा परकीय जो या वसुंधरेचे हरण करेल, असं करणारा सहा हजार वर्ष विष्ठेमधला कृमी बनेल
तर काटी येथील गधेगाळात ' हे जो मोडी राजा अथवा प्रजा तेयाची मायेसि गाढोअ' अशा प्रकारची मराठी वाक्यरचना आहे.

महाराष्ट्रातील काही गधेगाळ पुढीलप्रमाणे
१. कदंब भरूडदेव याचा सावरगाव लेख (इ.स. ११६४)
२. शिलाहार अपरादित्य याचा लोनाड लेख (मराठी)
३. शिलाहार अपरादित्य(द्वि.) याचा परळ लेख.
४. शिलाहार सोमेश्वरदेव याचा चांजे लेख( या लेखात शब्दरूपात गधेगाळ नसून शिल्परूपात आहे)
५. यादव रामचंद्र देव याचा पूर शिलालेख (इ.स. १२८५ फक्त शिल्परूपात)
६. यादव रामचंद्र देव याचा वेळापूर शिलालेख (इ.स. १२८५)
७. वेळूस शिलालेख (इ.स. १४०२)
९. शिलाहार राजा अनंतदेवाचा दिवेआगर शिलालेख(इ .स. १२५४)
अशी हीन दर्जाची शापवाणी कोरीव लेखांमध्ये कशी काय वापरली गेली याचा काहीच अंदाज येत नाही. यादव-शिलाहारांच्या लेखांतच आणि मुख्यत्वे मराठी भाषेतच ती आढळली आहेत आणि त्यातही गधेगाळीबरोबर बरेच वेळा शिवलिंगही असल्याने शैवपंथियांमध्येच अशा प्रकारची शिल्पे जास्त प्रचलित असावीत.
५. रतनवाडीतील हत्तीगाळ
६. अक्षी येथील गधेगाळ(फोटो आंतरजालावरून)
७. पिंपळवंडी गधेगाळ(फोटो शैलेन भंडारे यांजकडून)

संदर्भः
१. प्राचीन मराठी कोरीव लेख’ व ‘मराठी वाङ्मयाचा इतिहास’ संपादक : डॉ. शं. गो. तुळपुळे
२. महाराष्ट्राच्या इतिहासाचे साक्षीदार -प्रा. कल्पना रायरीकर, डॉ. मंजिरी भालेराव.⁠⁠⁠⁠


सुधागडा वरिल विरगळ

औरंगजेबाने सत्तास्थापनेच्या युद्धापुर्वी कोणाशी गुप्त करार करुन त्याला बादशहा बनवण्याचे आश्वासन दिले होते?

Daily Quiz # २६०

औरंगजेबाने सत्तास्थापनेच्या युद्धापुर्वी कोणाशी गुप्त करार करुन त्याला बादशहा बनवण्याचे आश्वासन दिले होते?

मुराद

१६५८ च्या फेब्रुवारी महिन्यात दक्षिणेची सर्व व्यवस्था लावून औरंगजेबाने औरंगबादेहून कूच केले. वाटेत त्याला मुराद येउन मिळाला, या दोघांमध्ये आधीच तह झाला होता.
औरंगजेब आणि मुराद यांच्यामधील संबंधाबाबत पुढील हकीकत प्रकाश टाकते. औरंगजेबाने पुढील काही अटींवर मुरादला मदत करण्याचे मान्य केले
होते. पहिली अट अशी होती की आपला शत्रू जो दारा त्याचा नाश करून राज्य दोघांनी
वाटून घ्यावयाचे. मुरादच्या विनंतीला बळी पडून औरंगजेबाने त्याला अशा तर्हेचे
लेखी वचन लिहून दिले. त्यामध्ये मुरादला द्यावयात येणाच्या प्रांतांचा समावेश होता.
इतकेच नव्हे तर आपण दिलेले वचन पाळू याबद्दल औरंगजेबाने-परमेश्वर आणि महमद
पैगंबर यांची शपथ देखील घेतली. (या पत्राचा मजकूर आदाब-इ-आलमगिरी, ७८ व,
७९ अ आणि तजकिरात उस्र सलातिन उस चगताईआ या ग्रंथांमध्ये पूर्णतया
आलेला आहे) औरंगजेबाचा खासगी कारभारी अकीलखान राजी हा देखील आपल्याला
या मैत्रीच्या तहाबाबतची काही हकीकत देतो. तो असे म्हणतो की मुरादबरोबर यावेळी
एकी करणे हे मुत्सद्देगिरीचे आहे असा विचार करून त्याने त्याला एक स्नेहपूर्ण पत्र
पाठविले आणि जी लूट मिळेल तिचा तिसरा हिस्सा व पंजाब अफगाणिस्तान काश्मीर
आणि सिंध हे प्रांत देण्याचे कबूल केले आणि त्या ठिकाणी आपल्या नावाने नाणी
पाडण्याचा व खुत्बा पठण करण्याचा मुरादचा अधिकार मान्य केला.

संदर्भ : औरंगजेबाचा इतिहास, जदुनाथ सरकार⁠⁠⁠⁠

शहाजीराजे आदिलशहाच्या कैदेत असताना मोगलांच्या कोणत्या शहजाद्या मार्फत शिवरायांनी शहाजहानशी संधान बांधले?

Daily Quiz # २५९


शहाजीराजे आदिलशहाच्या कैदेत असताना मोगलांच्या कोणत्या शहजाद्या मार्फत शिवरायांनी शहाजहानशी संधान बांधले?

उत्तर :- मुराद

मुस्तफाखानाने बाजी घोरपडेला शाहाजी राजांवर पाठवून २५-७-१६४८ च्या पहाटे दगाबाजीने कैद केले. अफझलखानाने त्यांना विजापूरला आणले. पुढे आदिलशाही सरदारांशी शिवाजीराजे आणि संभाजीराजे यांच्या महाराष्ट्र आणि कर्नाटकात लढाया होउन आदिलशाही सरदार पराभूत झाले.

बंडखोर
शहाजीला चांगली शिक्षा करण्याचे शहाचे विचार चालू असतां आणि तो विजापुरास येऊन
दाखल होतो तोंच, त्याच्या दोघां मुलांनीं स्वपराक्रमाने दोन भिन्न प्रदेशांत विजापुरी
फ़ौजेचा निभाव होऊ दिला नाही, हें वर्तमान दरबारात आल्यावर पुढे काय करावें
याचा विचार शहास पडला. इकडे यत्किंचित् माघार घेण्याचा प्रसंग वडिलांवर येऊ
न देतां आपण त्यांची सुटका करु अशी धमक शिवाजीराजास होती, म्हणूनच त्या संबंधाने
बाह्य उपाय त्यांनी चालविले. शहजादा मुरादबक्ष मोगल सुभेगिरीवर होता, त्यास
शिवरायांनी पत्र लिहून त्याचे मार्फत शहाजीराजेंच्या सुटकेचा इलाज सुरू केला. या
पत्रास ता. १४-३-१६४९ चा जबाब शहाजाद्याकडून आला कीं, “तुमचा इतबारी
वकील बोलणे करण्यास पाठवा .’ त्यावर शिवरायांनी काहीच जबाब पाठविला नाहीं ।
तेव्हां शहजाद्याने पुनः त्यांस ता. १४-८-१६४९ ला पत्र पाठवले कीं तुम्ही
हुजर यावे म्हणजे मनसब व इनाम दिल्हा जाईल.’ याचेही उत्तर शिवरायांनी पाठविलें
नाही, त्या वरून ता. ३-११-१६४९ चे शहजाद्याचे पत्र शहाजीराजास आलें कीं
तुमची मोकळिक करण्याविषयीं शिवजीने लिहिले आहे. हल्ली आम्ही दिल्लीकडेस जात
आहें. हुजूर पावल्यावर तुमचेविषयीं अर्ज करून बंदोबस्त करून देऊ. तुमचा इतबारी
वकील पाठत्रावा. तुम्हांकरितां पोषाख पाठविला आहे.’ याच तारखेचं शिवजीराजांसही
मुरादचे पत्र आले की ‘जुन्नर व अहमदनगर येथील देशमुखविषयी तुम्ही
लिहिले त्यास हुजूर गेल्यानंतर हा मजकूर घडोन येईल, ही खातरजमा ठेवावी.
आपणाकडील एक वकील पाठवावा म्हणजे काम होण्यास दिरंग लागणार नाही.
या वरून स्पष्ट आहे की मोगलांकडे वशिला लावून शहाजीच्या सुटकेचा प्रयत्न
शिवाजीराजांनी केला. त्या वरून मोगल बादशहापाशीं या पितापुत्रांचे वजन भारी आहे
आणि हे जाऊन मोगलांस सामील झाल्यास आपणांवर कठिण प्रसंग ओढवेल अशी
आदिलशहाची खात्री झाली.
दुसरी एक भीति शहाला होती की, शहाजी पुत्र संभाजी व श्रीरंगराय वगैरे हिंदु
सत्ताधीश, ज्यांना शहाजीवल मोठा आदर वाटत होता, ते सर्व एक होऊन कर्नाटकांत मिळविलेला प्रदेश हिसकावून घेतील; आणि मावळांतही शिवाजीराजांची बंडखोरी
वाढेल. अशी संकटे मुद्दाम ओडून आणण्यापेक्षां शहाजीराजांनाच समजुतीने वळवून
प्रकरण मिटविण्यांत राज्याचे हित आहे ही गोष्ट शइस पटली. मुस्ताफाखानाचे
मरणाने दरबारांतला कट्टर पक्ष बहुतेक नरमला होता. अफझलखानासारखे शहाजीराजांना
पायांत पाहणारे कित्येक होते, त्यांचे वजन खान महंमद वजिरापुढे चाललें नाहीं.⁠⁠⁠⁠

शून्यासंबंधीचे गणिती नियम सर्वप्रथम कोणत्या भारतीय ग्रंथातून मांडण्यात आले आहेत ?

Daily Quiz # २५८

शून्यासंबंधीचे गणिती नियम सर्वप्रथम कोणत्या भारतीय ग्रंथातून मांडण्यात आले आहेत ?

उत्तर - ब्रह्मस्फुटसिद्धांत


इ.स. ५९८ मध्ये जन्मलेल्या ब्रह्मगुप्ताने लिहिलेल्या "ब्रम्हस्फुटसिद्धांत" ह्या ग्रंथात सर्वप्रथम शून्याविषयीच्या गणिती नियमांचे केलेले विवेनचं आहे. ब्रह्मगुप्ताने या ग्रंथात शून्याविषयी चार नियम सांगितले आहेत.

पहिला नियम - कोणत्याही संख्येत शून्य मिळवले तर ती संख्या तीच राहते

दुसरा नियम - कोणत्याही संख्येतुन शून्य वजा केले तरी ती संख्या तीच राहते

तिसरा नियम - कोणत्याही संख्येला शून्याने गुणले तर उत्तर शून्य येते.

चौथा नियम - कोणत्याही संख्येला शून्याने भागले तरी उत्तर शून्य येते.

ब्रम्हगुप्ताचा हा चौथा नियम चुकीचा आहे. ही चूक भास्कराचार्या नी आपल्या लीलावती या ग्रंथात दाखवून दिली. पुढे न्यूटन आणि लायब्निज या विख्यात गणिततज्ञांनी त्यावर भाष्य केले.⁠⁠⁠⁠

जो पक्षी दिसावा हे प्रत्येक ट्रेकरचे, पक्षी निरीक्षकाचे स्वप्न असते अशा या अतिशय देखण्या पक्षाचे नाव काय

Daily Quiz # २५७

जो पक्षी दिसावा हे प्रत्येक ट्रेकरचे, पक्षी निरीक्षकाचे स्वप्न असते अशा या अतिशय देखण्या पक्षाचे नाव काय ?


उत्तर : स्वर्गीय नर्तक / Paradise Fly Catcher

अतिशय देखणा आणि नावाला साजेसा असणारा हा पक्षी दिसावा हे प्रत्येक पक्षी निरीक्षकाचे स्वप्न असते. एकदा का तो दिसला की त्याची नजाकत खरोखरच मनात कायम ठसणारी असते. 

या पक्ष्याची मादी अगदी बुलबुलासारखी असते आणि त्यांच्या एकंदर सवयीसुद्धा त्याच्याच सारख्या असतात. फक्त त्यांचा रंग वीटकरी, तांबुस असतो आणि डोक्यावर काळाशार लांब तुरा असतो. या मादीचे गळा आणि पोट राखाडी असते. या जातीतील नर पक्षी हा अतिशय देखणा असतो. हा नर साधारणत: २० सें.मी. एवढा मोठा असतो पण त्याची शेपटीच त्याच्या शरीराच्या दुप्पट लांब असते. त्याचे डोके आणि लांबलचक तुरा हे जर्द काळ्याशार चमकदा रंगाचे असते.

डोळ्याभोवती आकर्षक निळ्या रंगाची कडी असते. बाकी सगळे शरीर हे शुभ्र चमकदार, चंदेरी पांढऱ्या रंगाचे असते आणि म्हणूनच या हिंदीमधे "दूधराज" असे समर्पक नाव आहे. याची शेपटी गोलाकार असते आणि त्यातली मधली दोन पिसे अतिशय लांब आणि एखाद्या रिबीनीसारखी तरळत असतात. या जातीचे तरूण नर मादीच्याच रंगाचे तांबूस, विटकरी रंगाचे असतात आणि त्यांच्या वयाची ३ वर्षे पुर्ण झाल्यावर त्यांना हा पांढरा रंग येतो. कित्येकदा तर जंगलात अर्धा रंग पांढरा आणि अर्धा रंग तांबूस विटकरी असे सुद्धा नर बघायला मिळतात.

याचे इंग्रजी नाव पॅराडाईज फ्लायकॅचर आहे आणि या नावाप्रमाणेच ते जंगलात कायम हवेत उड्या मारून, सूर मारून, पटकन हवेतल्या हवेत कोलांट्या मारत माश्या, किटक, फुलपाखरे पकडत असतात. हा सुंदर पक्षी भारतात सर्वत्र सहज आढळतो. दाट जंगलांमधे थोड्या उघड्यावर, पाण्याच्या आजूबाजूला यांची वर्दळ कायम असते. 

यांचा विणीचा हंगाम साधारणत: मार्च ते जुलै महिन्यात असतो. या काळात नर हे हद्दप्रिय असतात आणि त्यांची घरट्याची जागा जिवापाड जपतात. या काळात ते मादीला खास शिळ घालून आळवतात. अर्थात या कामी त्यांची आकर्षक लांब शेपटीसुद्धा कामी येते.

नर मादीची जोडी जमल्यावर दोघे मिळून घरटे बांधतात. हे घरटे सहसा जमिनीपासून ६/८ फुटांवर बांधले जाते. दोन तीन काटक्यांमधे उभा कपसारखा घट्ट विणीव गोल बांधला जातो. या घरट्याला मुलायमपणा येण्यासाठी कोळ्याच्या जाळ्याचे तंतू, रेषमासारखे धागे वापरले जातात. मादी त्यात ३/५ पांढरट, गुलबट अंडी घालते. ही अंडी उबवण्याचे आणि पिल्लांचे पालनपोषण दोघेही नर मादी करतात.

हा इतका देखणा पक्षी आहे की दरवेळी त्याला बघतच रहावे असेच वाटत राहीले त्यातून हा भयंकर लाजरा बुजरा असल्यामुळे त्याचे आजपर्यंत काही माझ्याकडून छायाचित्रण झाले नव्हते. 

याला अनेक जंगलांमधे वेगवेगळ्या अवस्थांमधे बघितले होते पण छायाचित्रणाचा मोका मात्र आता पावसाळ्यात ताडोबाच्या जंगलात मिळाला. ताडोबाला आमच्या गाईडने सांगीतले की त्याने याचे घरटे बघीतले आहे. खरेतर याच्या घरट्याचा हंगाम उलटून गेला होता, तरीसुद्धा म्हटले की असेल एखादा "लेट लतीफ". 

आम्ही त्या गाईडसोबत त्या जागेवर पोहोचलो. त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याने ३ दिवसाआधी तेथे ३ अंडी बघितली होती. आम्ही पोहोचलो तर तिथे घरटे तर होते पण त्यात कोणीच नर मादी दिसले नाहीत. आम्ही निराश होऊन परत फिरणार तर वरती जांभळीवर त्यांचा ओळखीचा आवाज आला. मादी वरती बसून आम्हालाच न्याहाळत होती आणि चक्क तीच्या तोंडात किडा होता. याचा अर्थ या तीन दिवसात अंड्यातून पिल्ले बाहेर आली होती.
आम्ही जीप सुरक्षीत, लांब अंतरावर उभी केली आणि वाट पहात बसलो. ती मादी पटकन घरट्यावर आली, आतून एक इवलीशी चोच बाहेर आली त्यात तिने तो किडा भरवला आणि पटकने ती उडून गेली. आम्ही थोडावेळ अजून वाट बघत राहिलो. त्यानंतरच्या खेपेमधे चक्क तांबूस, लांब शेपटीचा नर आला होता. आजूबाजूच्या बांबूच्या बनात ते इकडे तिकडे उडून माश्या धरत होते आणि पिल्लांना भरवत होते. 

आमच्य दोन दिवसाच्या मुक्कामामधे आम्हाला त्यांचे मनसोक्त निरिक्षण आणि छायाचित्रण करता आले. आता फक्त पुर्ण वाढलेला चंदेरी, पांढरा नर कधी छायाचित्रे काढायची संधी देतोय याचीच वाट बघत रहायची.

लेखक - युवराज गुर्जर
स्त्रोत - युवराज गुर्जर ब्लॉग⁠⁠⁠⁠




Videos taken from Youtube. 

निजामशाहीतील प्रसिद्ध राज्यकर्ती स्त्री चांदबीबी हिचा खून कोणी व कधी केला ?

Daily Quiz # २५६

निजामशाहीतील प्रसिद्ध राज्यकर्ती स्त्री चांदबीबी हिचा खून कोणी व कधी केला?

उत्तर :- हमीदखान, अहमद नगर राजवाड़ा

इ.स.१५९९ मध्यें मोगल शहजादा दानियल हा पुन्हां अहमदनगरावर चालून आला. त्यावेळीं चांदबिबीनें कोणाही दरबारी इसमावर विश्वास न ठेवतां आपल्या स्वत:च्या विचारानें या आलेल्या संकटाचा परिहार करण्याचा संकल्प केला. पण मोंगली सैन्य प्रचंड असल्यामुळें त्याशीं टक्कर देण्याचें सामर्थ्य निजामशाही सैन्यांत बिलकुल राहिलें नव्हतें. तेव्हां चांदबिबी हिनें युक्तीनें तह करून, बालवयात आलेल्या बादशहासह जुन्नरास जाण्याचा विचार मनांत आणिला. परंतु निजामशाही सरदारांमध्येच दुफळी होऊन त्यांनीं चांदबिबीवर छुपा हल्ला करण्याचा निर्णय घेतला व इकडे किल्ल्याच्या बाहेर मोंगल सैन्याशीं लढाई चालू असतांच हमीदखान नामक एका पठाण सरदारानें तिचा अहमदनगर किल्ल्याच्या राजवाड्यांत खून केला ( सन १५९९ ).⁠⁠⁠⁠

गौतम बुध्दांवर उपचार करणारया प्रसिध्द राजवैदयाचे नाव काय होते ?

Daily Quiz # २५५

गौतम बुध्दांवर उपचार करणारया प्रसिध्द राजवैदयाचे नाव काय होते ?

जीवक

भगवान बुद्ध के काल मे वैद्यराज जीवक ने आयुर्वेद और शल्यचिकित्साशास्र विकसीत किया।जीवक ने पहली बार इस्तेमाल किया और सफलता के शिखर पर ले गये। वैद्यराज जीवक वनस्पति तथा जड़ी बुटी के पारखी थे। वे रसायनशास्त्र मे भी पारंगत थे।
         प्लास्टिक सर्जरी(प्राचीनकाल मे उसे काया शृंगार कहाँ जाता था) के जन्मदाता और आविष्कारक प्राचीन भारतीय वैद्य थे। इस विद्याका केंद्र तक्षशिला था ।यहाँ विदेश से छात्र पढ़ने आते थे।
  बौद्धोंका ऐतिहासिक ग्रंथ" महावग्ग"मे तथा त्रिपिटक"और"जातक कथा"मे वैद्य जीवक के शल्य चिकित्सा का वर्णन है।

Wednesday, 5 July 2017

विद्यमान इस्राईलचे प्रधानमंत्री बेंजामीन नेतन्याहू यांच्या लहान भावाचा ठीक ४१ वर्षांपूर्वी एका अशक्य कोटी आणि अत्यंत थरारक सैनिकी कारवाईत मृत्यू झाला. या सैनिकी कारवाईचे नाव काय ?

Daily Quiz # २५४ 

विद्यमान इस्राईलचे प्रधानमंत्री बेंजामीन नेतन्याहू यांच्या लहान भावाचा ठीक ४१ वर्षांपूर्वी एका अशक्य कोटी आणि अत्यंत थरारक सैनिकी कारवाईत मृत्यू झाला. या सैनिकी कारवाईचे नाव काय ?

उत्तर : ऑपरेशन एंटेबी

२७ जुन १९७६, दुपारी साडेबाराला 'एअर फ्रांसचे' उड्डाण संख्या A १३९ हे एअरबस ३०० विमान ग्रीस मधिल अथेन्स विमानतळाहून पॅरीसला जाण्याकरीता उडाले. इज्राइल मधिल 'तेल अवीव' येथून निघालेल्या या विमानात २४८ प्रवासी व १२ हवाई कर्मचारी होते. 

विमानात मुख्यतः इज्राईल, फ्रांस, ग्रीक, अमेरीका, इंग्लंड तसेच इतर देशातील नागरीक प्रवास करीत होते. विमान अवकाशात झेपावताच अवघ्या काही वेळातच विमानाला २ पॅलेस्तीनी आणि २ जर्मन अतिरेक्यांनी अपह्रुत केले. पैकी २ अतिरेकी 'Popular Front for the Liberation of Palestine – External Operations' आणि उर्वरीत २ 'German Revolutionary Cells' या संघटनांशी संबंधीत होते. 

अपह्रुत विमानाला लिबिया मधे बांगझेईला(अवांतर -बांगझेइ काही महिन्यांपूर्वी गद्दाफीमूळे बाताम्यांत होते.) उतरविण्यात आले. तिथे विमानात इंधन भरून तब्बल ७ तासांनी म्हणजे पहाटे ३ला विमान युगांडामधे एंटेबी विमानतळावर उतरविण्यात आले. दरम्यान बांगझेइला एका महिला प्रवाश्याला तिने गर्भपात झाल्याचे सांगितल्याने(बतावणी केल्याने) सोडून देण्यात आले होते. 

एंटेबीला या ४ अतिरेक्यांना आणखी ४ अतेरेकी येऊन मिळाले. त्यांना युगांडचे तत्कालीन राष्ट्र्पती इदी अमीन यांचा पूर्ण पाठींबा होता.
विमानाला सोडण्यासाठी अतिरेक्यांनी इज्राइअलमधे बंदी असलेले ४० व इतर देशांतील १३ असे एकूण त्रेपन्न पॅलेस्तीनी जणांच्या सुटकेची मागणी ठेवली तसे न केल्यास १ जुलै पासून सर्व बंधकांना मारण्याची धमकी दिली. 

अतिरेक्यांनी बंधकांना इज्राईली नागरीक व ईतर अशा दोन गटात विभागले. पुढील एक आठवडा या सर्व बंधकांना विमानतळातील एका खोलीत ठेवण्यात आले होते. दरम्यान परत काही बंधकांना सोडण्यात आले पण तरी तब्बल १०६ बंधक अजुनही अतिरेक्यांच्या ताब्यात होते.

अतिरेक्यांनी त्यांचा मागण्या लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास उर्वरीत बंधकांना मारण्याची परत धमकी दिली. त्याचबरोबर फ्रांसहून आलेल्या विशेष विमानानी विमानातील कर्मचारी व ज्यू लोकांव्यतिरीक्त इतर बंधकांना जाण्याची मुभा देण्यात आली. ही घोषणा ऐकताच मुख्य वैमानीक मायकेल बाकोस याने 'विमानासकट सर्व प्रवासी हे माझी जबाबदारी असल्याने' विमान सोडण्यास तीव्र निषेध केला. इतर कर्मचार्यांनी सुद्धा त्याला अनुमोदन दिले. या कर्मचार्यांव्यतिरीक्त एक फ्रेंच धर्मोपदेशीकेनीपण विमान सोडण्यास नकार दिला पण तीला बळजबरीने एअर फ्रांसच्या विमानात चढविण्यात आले.

आता विमानात ८५ ज्यू आणि २० इतर असे एकूण कर्मचारी मिळून १०५ जण शिल्लक राहिलेत. या मुक्त केलेल्या बंधकात एक 'फ्रेंच ज्यु' प्रवासीपण चुकून मुक्त झाला होता. हा प्रवासी सैनिकी प्रशिक्षण घेतलेला असल्याने त्याने अतिशय महत्वपूर्ण व नेमकी माहिती मोसादला पुरविली.

वाटाघाटी

मधिल एक आठवड्यात इज्राइलनी राजकीय पातळीवरून वाटाघाटी सुरू केल्या होत्या. सोबतच सैनिकी कारवाईचीपण तयारी चालविली होती. पण ही अतिशय धाडसी आणि महत्वाकांक्षी सैनिकी कारवाई जर अयशस्वी झालीच तर अतिरेक्यांची मागणी पूर्ण करण्याची मानसिक तयारीपण ठेवली होती. 

इज्राइल सेनेतून निवृत्त झालेल्या एक बड्या अधिकार्याचे इदी अमीन बरोबर असलेले सलोख्याचे संबंध लक्षात घेऊन त्यालापण अमीनसोबत बोलणी करायला लावले पण प्रयत्न निष्फळ झाला. तसेच अमेरीकेकरवी इजिप्तचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष अन्वर सादत यांचीसुद्धा अमीनशी बोलणी करण्याबद्दल विनवणी केली गेली.
या सर्व निष्फळ प्रयत्नात १जुलै उजाडला. 

इज्राइललने अतिरेक्यांना वाटाघाटी करण्यासाठी मुदत ४ जुलै पर्यंत वाढवण्याची विनंती केली जिला इदी अमीन यांनीसुद्धा धूर्त पाठींबा दर्शविला. पण या पाठींब्याचे कारण पात्र वेगळे होते. या मुदतीत अमीनचा मॉरीशसला जाउन 'Organisation of African Unity' या संघटनेच्या अध्यक्षपदाची सूत्रं सिवसागर रामगुलाम यांना सोपविण्याचा मनसुबा होता. हे तीन दिवस अतिशय महत्वपूर्ण ठरलेत. 

३ जुलैला इज्राइली मंत्रीमंडळानी सैनिकी कारवाईला परवानगी दिली . या मिशनची मुख्य जबाबदारी मेजर जनरल येकुतीएल कुती अॅडम व मातान विलनाई यांचेवर तर ब्रिगेडीयर जनरल डान शोमरोन यांना खर्या कारवाईची कमान सोपविण्यात आली. हे सगळं घडत असताना सुद्धा राजकीय पातळीवरून प्रयत्न सुरूच होते. इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षांची शिष्टाईपण मदत करू शकली नाही.

अभियानाची तयारी व आखणी
मोसाद या इज्राइली शासकीय गुप्तहेर संस्थेने एंटेबी विमानतळाची हुबेहूब प्रतीकृती बनविण्याची तयारी चालविली होती. हे करताना मुक्त केल्या गेलेल्या बंधकांचीपण मदत घेतली गेली. त्याचबरोबर या विमानतळच्या बांधकामात ज्या इज्रायली कंपनीने मदत केली होती त्यांनापण पाचारण करण्यात आले. या बांधकामात ज्या व्यक्तींनी प्रत्यक्ष सहभाग घेतला होता त्यांना बोलावून एक गोष्ट सांगितली गेली ती ही की प्रतिकृती पूर्ण झाल्यावर त्यांना जोपर्यंत अभियान पूर्ण होणार नाही तो पर्यंत राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव तिथेच राहावे लागेल.
अभियानाची योजना करताना एक गोष्ट निश्चीत झाली की बहुतांश आफ्रिकन देशांची सहानुभूती इज्राइली बंधकांसोबत असली तरी प्रत्यक्षात इदी अमीनच्या विरोधात इज्राइलच्या संभावित कारवाईत मदत करायाला कोणाताही देश धजावणार नव्हता. 

आता पंचाइत अशी होती की इज्राइलने या अभियानाकरीता निवडलेल्या लोकहीड सी १३० हर्क्युलीस विमानाला इतका लांबचा पल्ला पुन्हा इंधन भरल्याखेरीज साधणे कठीण होते. सोबतच इतक्या दुरवर हवेतच ५-६ विमानांना इंधन पूरविणे शक्य नव्हते. प्रतिकूल गोष्टींची यादी बरीच लांब होती. इतकी सगळी शस्त्रास्त्रे विमानातून घेऊन जाताना ज्या देशाची सीमा ओलांडायची होती त्या- त्या देशांची संमती आवश्यक होती अन्यथा या कृतीकडे चिथवणी समजून संबंधीत देशांकडून प्रत्युत्तर मिळण्याची दाट शक्यता होती.

याशिवाय एकातरी पूर्व आफ्रिकन देशाची सीमा ओलांडल्याखेरीज एंटेबीला पोचणे शक्य नव्हते. त्यातल्या त्यात केनिया थोडा अधिक सौम्य असल्याने केनियातील एका बड्या इज्राइली हॉटेल उद्योजकाने केनियन सरकारची मनधरणी करून इज्राइलला केनियाची सीमा वापरण्याची परवानगी मिळवून दिली सोबतीलाच 'Jomo Kenyata International Airport' या विमानातळावर इंधन भरण्याची अनुमती पण मिळवली. 

ही सर्व सज्जता करून ३ जुलैच्या मध्यरात्री अंधाराचा फायदा घेत ४ लोकहीड सी १३० हर्क्युलीस विमानांनी एंटेबीच्या दिशेनी कूच केले.

गटांची विभागणी

१०० इज्राइली कमांडो हे ३ गटात विभागल गेले होते.

१.भूदल नियंत्रण तुकडी
या छोटेखानी तुकडीत ब्रि. ज. शोम्रोन, प्रसारण व सहाय्यक सैनिकांच ताफा होता.

२. हल्लाबोल गट
ले.क. योनातन नेतनयाहु यांच्या नेतृत्वात 'सियेरात मत्कल' या इज्राइल्च्या २९ ब्लॅक कमांडोंचा गट. याची मुख्य जबाबदारी म्हणजे जुन्या विमानतळाला उध्वस्त करणे आणि बंधकांची सुखरूप सुटका. यांची परत दोन गटांमधे विभागणी केल्या गेली होती. मेजर बेत्सर व मतन विलनाइ हे त्या गटांचे प्रमुख.

३. 'रिएंफोर्समेंट टीम'

अ. जागा सुरक्षित करणे, इज्राइली विमानांना शत्रुपासुन सुरक्षित ठेवणे व सुटका कीलेल्या बंधकांना विमानात चढविणे.

ब. युगांडा वायु सेनेच्या मिग फायटर विमानांना नष्ट करणे जेणेकरून ते परतीला पाठलाग करण्यास असमर्थ होतील.

क. विमानात इंधन भरण्यात मदत करणे.

परिक्षेचा दिवस
एंटेबीचा मार्ग शर्म - अल - शेख वरून अंतरराष्ट्रीय हवाई मार्गानी लाल समुद्रावरून जार्णारा होता. या मार्गावरून जाताना उडाणाची उंची अवघ्या १०० फुटांवर ठेवण्यात आली होती जेणेकरून इजिप्त, सुदान आणि सौदी अरेबीयाला याचा सुगावा लागणार नाही. लाल समुद्राच्या दक्षिण निकासावर हा ताफा परत दक्षिणेकडे वळून डिजबोटी मार्गे ईशान्येकडे नैरोबीकडे मार्गक्रमण करू लागला. या मार्गात सोमालीया, इथिओपीआ ओलांडून आफ्रिकन रिफ्ट दरी व विक्टोरीया तलावावरून उडाला.
दोन बोइंग ७०७ विमाने मालवाहू विमानांच्या मागोमाग उडडत होती. पैकी वैद्यकीय सुविधा असलेलं पहीलं बोइंग नैरोबी विमानतळावर उतरलं. तर दुसरं बोइंग (जन. येकुतीएल अॅडम असलेलं) कारवाई सुरू असताना एंटेबी विमानतळावर घिरट्या घालत राहीलं. 

रात्री ११ वाजता इज्राइली फौजा एंटेबी विमानतळावर उतरल्या. उतरण्यापूर्वीच विमानाचे कार्गो दरवाजे हवेतच उघडण्यात आले होते. विमान उतरताच त्यामधून काळी मर्सीडीज व सोबतीला लॅड रोव्हर्सचा ताफा चपळाइनी बाहेर आला व मुख्य ईमारतीकडे मार्गक्रमण करू लागला. 

ही खेळी युगांडन फौजांना गुंगारा देण्यासाठी होती. जणू युगांडन राष्ट्राध्यक्ष अमीन परदेशी दौरा करून परत आलेत व इतर उच्च अधिकारी सोबत आहेत असे भसवण्यासाठी. या गाड्यांमधून हल्लाबोल गट वेगानी ईमार्तीकडे झेपावला. पण एक चूक झाली काही दिवसापूर्वीच अमीन यानी काळी मर्सीडीज सोडुन पांढरी मर्सीडीज ताफ्यात सामील केली होती व याची कल्पना तेथिल सुरक्षा रक्षकांना असल्याने त्यांनी हा काफीला थांबवण्यास सांगताच त्यांना 'सायलेंसर' बसविलेल्या बंदूकीने फैरी झाडण्यात आल्या. 

जसे ते पुढे जऊ लागले लँड रोव्हर मधील कमांडोंना ते रक्षक मेलेले नसुन जिवंत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ रायफलनी गोळ्या झाडून त्यांना मारले पण या रायफलला सायलेंसर न्हवता. त्यामूळे या जोराच्या आवाजानी मिशन फसू नये म्हणून कमांडोंनी लगेच मोटारीबाहेर उड्या घेतल्या.

बंधक सुटका

सर्व बंधक धावपाट्टीलगतच्या ईमारतीच्या मुख्य खोलीत होते, कमांडो आत शिरताच हिब्रू व इंग्रजीतून ओरडू लागले " खाली बसा आम्ही इज्रायली सैनीक आहोत" एक बंधक उभा राहाताच त्याला चुकून अतिरेकी समजून मारण्यात आले. कारवाई सुरू होतच बंधकांच्या खोलीत शिरलेला अतिरेक्याने बंधकांना शौचालयात आश्रय घेण्यास सांगीतले. "बाकीचे अतिरेकी कुठे आहेत?"कमांडो ओरडले त्यासरशी बंधकांनी दुसर्या खोलीकडे बोट दाखविले कमांडोनी लगेच तिकडे काही ग्रेनेड भिरकावले व क्षणाता आत घुसून इतर ३ अतिरेक्यांना कंठस्नान घातले. 

अशाप्रकारे मुख्य हल्ला संपला होता. याच दरम्यान उर्वरीत ३ मिग विमानातून बंधकांना विमानांपर्यंत नेण्यासाठी चिलखती गाड्या उतरल्या. या गाड्यांचा उपयोग इंधन भरताना बचावासाठी व युगांडन वायु दलाच्या विमानांना नष्ट करण्यासाठीपण झाला.

परतीची वाट

सुटका केलेल्या बंधकांना विमानात चढ्विताना युगांडन सैनिकांनी प्रतिहल्ला चढविला. याला सडेतोड प्रत्यत्तर देण्यात आले पण असे करताना योनातन नेतन्याहू यांच्या छतीत गोळी घुसून ते मरण पावले. या व्यतिरीक्त ५-६ कमांडोसुद्ध जखमी झाले. हे अभियान एकूण ५३ मिनीटे चालले. यात सर्व अतिरेकी ठार झाले तसेच ४०-४५ युगांडाचे सैनिक व ११ युगांडन वायु सेनेची मिग विमाने उध्वस्त केली गेली. १०६ बंधकांपैकी ३ ठार झाले, १० जखमी तर एका बंधकाला युगांडात सोडून देण्यात आले. नंतर याचा वचपा म्हणून अमीन यांनी युगांडात वस्तव्यास असलेल्य शेकडो केनियन नागरीकांची कत्तल घडविली.

जागतीक प्रतिक्रीया

चिडलेल्या युगांडने संयुक्त राष्ट्रसंघच्या सुरक्षा समितीची बैठक बोलावून इज्राएल विरूद्ध निंदाप्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला उत्तर देताना इज्राइली राजदूतानी अतिशय समर्पक व बाणेदार उत्तर दिले, "आम्ही या समितीपुढे सरळ संदेश घेउन आलो आहोत : आम्ही जे काही केलं त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे कारण आम्ही जागाला दाखवून दिलं की इज्राइल सारखा एक छोटासा देश, ज्याला या परिषदेतील सगळे सदस्य ओळखतात, त्याच्यासाठी मानवी स्वाभिमान, जीवन आणि स्वातंत्र्य ही सर्वोच्च मूल्ये आहेत. आम्हाला शेकडो स्त्री, पुरूष व बालकांचा जीव वाचविल्याचा जितका अभिमान आहे त्याहून जास्त अभिमान मानवी स्वातंत्र्यासाठी केलेल्या धाडसाचा आहे".

साहाजिकच हा प्रस्ताव पार झाला नाही. संपूर्ण पाश्चिमात्य देशांनी या धाडसी कृतीबद्दल इज्राएलची पाठराखण केली. योगायोगानी कारवाईचा दिवस ४-जुलै -१९७६ आणि अमेरिकी स्वातंत्र्याचा जाहिरनामा प्रसिद्ध झाल्याचा २०० वा वर्धापनदीन एकाच दिवशी आलेत.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या सचिवांनी या हल्ल्याची 'राष्ट्रसंघाच्या सदस्याच्या सार्वभौमिकतेवरील हल्ला म्हनून निर्भत्सना केली'. अरब व कम्युनिस्ट देशांनीपण या घटनेची निंदा केली.
संधी मिळूनसुद्धा विमान न सोडल्याबद्दल एअर फांसच्या वैमानिकाला सक्त ताकीद देउन सेवेतून निलंबीत केलं गेलं. या वैमानिकाला पुढे जाऊन फ्रांसचा सर्विच्च बहुमान ' National Order of the Legion of Honour' तर इतर कर्मचार्यांना 'French Order of Merit' ह सम्मान प्रदान केला गेला.

पुढे या धर्तीवर आधारीत कमांडोंचा एक गट अमेरिकेनीसुद्धा तयार केला. या संपूर्ण रोमहर्षक, धाडसी अभियानावर बेतलेले कित्तेक चित्रपट बनविले गेले.

आजही जगातील अत्यंत जिकरीच्या, अशक्य कोटितील साहसाची परीसीमा गाठणर्या अभियानांच्या यादीत 'ऑपरेशन एंटेबीला' मानाचं अढळ स्थान आहे.⁠⁠⁠⁠

या घटनेवर आधारित raid on entebbe हा Hollywood चा चित्रपट पहाण्या सारखा आहे

यावरील पुस्तक :

मराठी - किबुत्झ मधला डॅनी इथे आला होता - अनंत सामंत

English - 90 Minutes at Entebbe.


एका प्रकल्पा अंतर्गत ब्रिटिशांनी कॉजवे बांधून मुंबईचे साथ बेट एकत्र केले, त्या प्रकल्पाचे नाव सांगा ?

Daily Quiz # २५३ 

एका प्रकल्पा अंतर्गत ब्रिटिशांनी कॉजवे बांधून मुंबईचे साथ बेट एकत्र केले, त्या प्रकल्पाचे नाव सांगा ?

उत्तर - The Hornby Vellard (होर्नबी वेलार्ड)

The Hornby Vellard was a project to build a causeway uniting all seven islands of Bombay into a single island with a deep natural harbour. The project was started by the governor William Hornby in 1782 and all islands were linked by 1838. The word vellard appears to be a local corruption of the Portuguese word vallado meaning fence or embankment.[1]

The purpose of this causeway was to block the Worli creek and prevent the low-lying areas of Bombay from being flooded at high tide. The cost was estimated at about Rs. 100,000. It was completed in 1784 and was one of the first major civil engineering projects which transformed the original seven islands of Bombay into one island.

According to some accounts, Hornby ordered the work to be started after the East India Company turned down his proposal; and continued as Governor till the end of his term in 1784, ignoring the suspension notice sent to him. [2]

One story of the origin of the Mahalaxmi temple links it to this project. The chief engineer for the project dreamed of a statue of the Hindu goddess Laxmi in the sea following multiple collapses of the sea-wall. Such a statue was then recovered, and the temple was built with it as the idol, as an offering for successful completion of this undertaking.⁠⁠


आजची मुंबई हा सात बेटांचा समूह होता. या बेटांवर पाषाणयुगापासून वस्ती असल्याचे पुरावे आहेत. याचा सर्वांत जुना लिखित पुरावा इ.स.पू. २५० सालातील असून यात मुंबई शहराचा उल्लेख ग्रीकांनी (Heptanesia असा) नोंदवला आहे. इ.स.पू. ३ च्या सुमारास ही बेटे सम्राट अशोकाच्या मौर्य साम्राज्यात समाविष्ट होती. शिलाहार या हिंदू साम्राज्याने १३४३ पर्यंत मुंबईवर राज्य केले व नंतर गुजरातच्या मुस्लिम साम्राज्याने मुंबई हस्तगत केली. एलिफंटा गुहा व वाळकेश्वर मंदिर ही याच काळातील आहेत. १५३४ साली पोर्तुगीजांनी बहादूरशहाकडून मुंबई काबीज केली व तिला बॉम बाहीया असे नाव दिले. १६६१ रोजी पोर्तुगीजांनी मुंबई इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा याच्या कॅथेरीन दे ब्रगांझा या पोर्तुगीज राजकन्येशी झालेल्या लग्नात हुंडा म्हणून देऊन टाकली व नंतर मुंबई ब्रिटिश राजघराण्याकडून ईस्ट इंडिया कंपनीस भाड्याने देण्यात आली. कंपनीस मुंबई ही उपखंडात पहिले बंदर स्थापन करण्यास योग्य वाटली. १६८७ रोजी ईस्ट इंडिया कंपनीने आपले कार्यालय सुरतेहून मुंबईत हलविले. कालांतराने हे शहर मुंबई इलाख्याची (Bombay Province) राजधानी झाली. १८१७ ते १८४५ पर्यंत होर्नबी वेलार्ड (Hornby Vellard)च्या अंतर्गत बेटे जोडून जमीन सलग करण्याचे काम मुंबईत सुरू होते. याचा परिणाम म्हणून मुंबईचे क्षेत्रफळ ४३८ वर्ग कि.मी. झाले. १८५३ रोजी आशियातील पहिला लोहमार्ग मुंबईत बनवला गेला.⁠


एकाच दगडातून निर्माण केलेली ( एकाश्म ) जगातील सर्वात मोठी मूर्ती कुठे आहे ?

Daily Quiz # २५२

एकाच दगडातून निर्माण केलेली ( एकाश्म ) जगातील सर्वात मोठी मूर्ती कुठे आहे ?

उत्तर : श्रवणबेलगोला या गोमतेश्वर

कर्नाटक राज्य के श्रवणबेलगोला शहर के निकट चंद्रगिरी पहाड़ी (618 सीढियां चढ़कर इस मूर्ति तक पहुंचा जा सकता है) की चोटी पर स्थित गोमतेश्वर (जिसे श्रवणबेलगोला भी कहा जाता है) की एक ही पत्थर से निर्मित विशालकाय मूर्ति जिसे जैन संत बाहुबली के नाम से भी जाना जाता है। इसका निर्माण लगभग 983 ई. में गंगा राजा रचमल (रचमल सत्यवाक् चतुर्थ 975-986 ई.) के एक मंत्री चामुण्डाराया द्वारा करवाया गया था। ऐसा कहा जाता है कि इस मूर्ति को महीन सफ़ेद ग्रेनाईट के एक ही पत्थर से काटकर बनाया गया है और धार्मिक रूप से यह अत्यधिक महत्त्वपूर्ण है क्योंकि जैनियों का मानना है कि मोक्ष (जीवन-मरण के चक्र से छुटकारा) की प्राप्ति सर्वप्रथम बाहुबली को हुई थी। यह मूर्ति एक कमल पर खड़ी हुई है। जांघों तक यह बिना किसी समर्थन के खड़ी है और इसकी लंबाई 60-फुट (18 मी.) और चेहरे का माप 6.5-फुट (2.0 मी.) है। जैन परंपरा के अनुरूप यह मूर्ति पूर्णतया नग्न अवस्था में है और 30 किमी की दूरी से दिखाई देती है। मूर्ति के चेहरे के निर्मल भाव, घुंघराली आकर्षक जटाएं, आनुपातिक शारीरिक रचना, विशालकाय आकार और कलात्मकता तथा शिल्पकला के बेहतरीन मिश्रण के कारण इसे मध्यकालीन कर्नाटककी शिल्पकला की सर्वश्रेष्ठ उपलब्धि कहा जाता है। यह पूरे विश्व में एक पत्थर से निर्मित (एकाश्म) सबसे विशालकाय मूर्ति है.


गोमतेश्वर प्रतिमा के अलावा श्रवणबेलगोला के आसपास के क्षेत्रों में जैनियों की बस्तियां और उनके तीर्थंकरों की कई प्रतिमाएं भी मौजूद हैं। चंद्रगिरी पहाड़ी के ऊपर से आसपास के क्षेत्रों के एक सुंदर दृश्य को देखा जा सकता है। प्रत्येक 12 वर्षों में हजारों श्रद्धालु महामस्तकाभिषेक के लिए यहां एकत्र होते हैं। इस अत्यंत शानदार मौके पर हजार वर्ष पुरानी प्रतिमा का दूध, दही, घी, केसर तथा सोने के सिक्कों से अभिषेक किया जाता है। पिछला अभिषेक फरवरी 2006 में हुआ था और इसकी अगली तिथि 2018 में है।⁠⁠⁠⁠



अतिरिक्त (surplus) उत्पन्नाची निर्मिती आणि वितरण याबद्दल अर्थव्यवस्थेची प्रतिकृती सर्वप्रथम बनवणार अर्थशास्त्रज्ञ कोण ?

Daily Quiz # २५१

अतिरिक्त (surplus) उत्पन्नाची निर्मिती आणि वितरण याबद्दल अर्थव्यवस्थेची प्रतिकृती सर्वप्रथम बनवणार अर्थशास्त्रज्ञ कोण ?

उत्तर - फ्रँस्वा केने

फ्रँस्वा केने चा जन्म ४ जून १६९४ रोजी व्हर्साय जवळील मेरे येथे झाला.
केनेने जगातली सर्वात पहिली 'टाब्लु इकॉनॉमिक' नावाची अर्थव्यवस्थेची प्रतिकृती बनवली. अर्थव्यवस्थेत अतिरिक्त उत्पन्न अर्थात सरप्लस किती निर्माण होतो त्यावर आर्थिक वाढ अवलंबून असते. हा सरप्लस कसा निर्माण होतो आणि त्याचे वितरण किंवा डिस्ट्रिब्युशन कसे होते तसेच अर्थव्यवस्थेतील सर्व विभागांचा एकमेकांशी काय संबंध असतो याचे सविस्तर विवेंचन सर्वप्रथम केने ने केले.

केने वयाच्या तेराव्या वर्षीच अनाथ झाला, अकराव्या वर्षापर्यंत तर त्याला वाचताही येत नव्हते. १७१७ साली सर्जरीत मास्टर्स डिग्री मिळवून त्याने प्रॅक्टिस सुरू केली पण डोळ्यात झालेल्या बिघाडाने त्याने सर्जन ऐवजी फिजिशीयन व्हायचे ठरवले. १७४४ साली त्याने मेडिसिन मध्ये डॉक्टरेट मिळवली आणि तो फ्रेंच अकॅडमी ऑफ सायन्सेस चा सभासद  झाला. त्याने पंधराव्या लुईचा वैद्यकीय सल्लागार म्हणूनही काम केले. वयाच्या ६०व्या वर्षांपर्यंत केने चा अर्थशास्त्राशी काहीच संबंध नव्हता. दी गुर्ने या अर्थतज्ञ-उद्योजकाशी मैत्री झाल्यावर केने अर्थशास्त्राकडे वळला. पैसा आणि वस्तू यांच्या चक्राकार प्रवाहाविषयी केनेने आपली मते मांडली. ही कल्पना त्याला रक्ताभिसरणा वरून सुचली असे त्याने लिहून ठेवलेय. बचत करणं अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने हानिकारक असत, त्यामुळे बचत केलेला पैसा अर्थव्यवसंस्थेच्या चक्रीय प्रवाहातून बाहेर पडतो आणि त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न कमी होते असा विचार केने ने मांडला. व्यापार, कारखानदारी आणि वाहतूक यामुळे वस्तूंचे आकार आणि त्यांची मालकी बदलते पण त्यामुळे नवीन काही निर्माण होत नाही असे त्याचे मत होते.


१६ डिसेंबर १७७४ रोजी केनेचे निधन झाले. पण त्याच्या टाब्लु इकॉनॉमिक मुळे अर्थशास्त्रात त्याचे नाव अजरामर झाले आहे.⁠⁠⁠⁠


पोर्तुगालच्या राजाने मुंबई हे बेट इंग्लंडच्या कोणत्या राजाला आंदण म्हणून दिले ?

Daily Quiz # २५०

पोर्तुगालच्या राजाने मुंबई हे बेट इंग्लंडच्या कोणत्या राजाला आंदण म्हणून दिले ?

उत्तर :- राजा चार्ल्स् दुसरा(इंग्लंड) 

टॉलमीने जागतिक नकाशावर मुंबईची नोंद केली, त्याला आता १८६३ वर्षे झाली आहेत. इ.स. १५० मध्ये दक्षिण महाराष्ट्र सातवाहनांच्या ताब्यात होता. ‘गाथा सप्तशती’ लिहून म-हाटी संस्कृतीचे अनेक पैलू अजरामर करणा-या राजा हळाचा तो काळ. अगदी इ.स. २२० पर्यंत त्यांचे राज्य दक्षिण महाराष्ट्रात तग धरून होते. त्यानंतर मौर्य, चालुक्य राष्ट्रकुट, शिलाहार, देवगिरीचे यादव यांनी तेराव्या शतकापर्यंत महाराष्ट्रावर पर्यायाने मुंबईच्या आसपासच्या प्रदेशावर अधिराज्य गाजवले. १३१७ मध्ये आलेल्या अल्लाउद्दीन खिलजीच्या टोळधाडीने आमच्या यादवरायांच्या राजसत्तेला नष्ट करून महाराष्ट्राला इस्लामी अंमलाखाली आणण्याची सुरुवात केली. त्यामुळे मुंबईनेही बहामनी आणि गुजरातमधील महमद बेगडासारख्या सुलतानांच्या राजवटींचा अनुभव घेत, पोर्तुगीजांच्या वर्चस्वाचा स्वीकार केला. पुढे जून १६६१ मध्ये पोर्तुगालच्या राजाने आपली मुलगी इंग्लंडच्या दुस-या चार्ल्सला देताना, मुंबई शहरही हुंडा म्हणून दिले.

अर्थात या मुंबई महानगराने अनेक चांगले लोक पाहिले. म्हणून सात बेटांचा समूह ज्याला १७०० साली गव्हर्नर सर निकोलस बेट याने ‘अतिदरिद्री आणि मोडकळीस आलेले असे बेट’ म्हटले होते, ते आज महानगर बनले आहे. १६६४ साली ईस्ट इंडिया कंपनीने मुंबईला व्यापारी शहर बनविण्याचा निर्णय घेतला. अर्थात त्यासाठी एक खूप मोठी घटना कारणीभूत ठरली होती. ती म्हणजे पाच जानेवारी १६६४ रोजी छत्रपती शिवाजी राजे यांनी सुरतेवर स्वारी केली होती. महाराजांनी सुरतेचे व्यापारी महत्त्व जाणून मुगल, इंग्रजांसह सर्वच परकीय वसाहतवादी लोकांचे मर्मस्थळ फोडण्याचा अत्यंत धाडसी निर्णय घेतला होता. रायगडापासून सुरतेपर्यंतचे अंतर घोडयावरून पार करून छत्रपतींच्या फौजा सुरतेवर धडकल्या; परंतु त्याआधी संपूर्ण शहरात मराठयांच्या हेरांनी आपले जाळे पसरले असेल, त्यामुळे सुरतेतील पेढया वखारी आणि श्रीमंत लोकांच्या हवेल्यांमध्ये कधी आणि कसा प्रवेश करायचा याची परिपूर्ण माहिती मावळ्यांना मिळाली होती. जेम्स ग्रँड डफ याने १८२६ मध्ये लिहिलेल्या ‘मराठयांच्या इतिहासात’ महाराजांच्या सुरतेच्या स्वारीबद्दल खास वर्णन वाचायला मिळते.

डफच्या मते आठ हजार सैनिकांसह आलेल्या शिवाजी राजांच्या स्वारीने सुरतेचा मुगल सरदार घाबरून गेला होता. आपले शहर वाचविण्याचा अखेरचा प्रयत्न म्हणून त्याने शिवबा राजांवर मारेकरी धाडले आणि तीच चूक त्याच्या अंगाशी आली. ‘अखंड सावध’ असणा-या शिवबा राजांच्या संरक्षण कवचामुळे मुगल सरदारांचा तो दुष्ट हेतू फसला; परंतु त्यामुळे मराठा सैन्यात जो संतापाग्नी पेटला, त्यात निम्म्याहून अधिक सुरत जळून खाक झाले. सतत सहा दिवस मराठयांच्या टाचेखाली आलेल्या सुरतची सगळी ‘सूरतच’ बदलून गेली होती आणि त्याच प्रसंगाने भेदरून गेलेल्या ईस्ट इंडिया कंपनीने सुरत सोडली. आणि दुसरे सुरक्षित बंदर म्हणून मुंबईचा विकास करण्याची योजना केली. त्या वेळी पाण्याने भरलेली सात बेटे अशी मुंबईची स्थिती होती. १६७२ मध्ये डॉ. फ्रायर यांनी मुंबईला भेट दिली. त्या वेळी त्यांचे मुंबईबद्दलचे मत काय होते, तर ‘येथे आसपास खाजणे, खाडया असल्यामुळे हवा सर्द आणि रोगट आहे. जमीन चांगली नसल्यामुळे अन्नधान्य वगैरे काही पिकत नाही. कित्येक लोक तर मुंबईला यमपुरी म्हणतात.’ असे डॉ. फ्रायर यांनी लिहून ठेवले आहे; परंतु जेरॉल्ड अँजियर या ईस्ट इंडिया कंपनीच्या कर्तबगार अधिका-याने आपल्या हुशारीच्या, हिमतीच्या बळावर मुंबईच्या विकासाचा पाया घातला. परिणामी साडेतीनशे वर्षात यमपुरी मायापुरीत रूपांतरित झाली.

इंग्रजांच्या कंपनी सरकारने समुद्राने वेढलेल्या मुंबईच्या भौगोलिक स्थितीचा व्यापारासाठी जेवढा फायदा करून घेतला, तेवढाच त्यांना स्वसंरक्षणासाठीही ही भौगोलिक ठेवण उपयुक्त ठरली. अन्यथा जेव्हा अठराव्या शतकात मराठी फौजांनी अवघा हिंदुस्थान आपल्या टाचांखाली आणला होता, त्यातून मुंबईही सुटली नसती. मात्र इंग्रजांनी आरमारी व्यवस्थेत मिळवलेले प्रावीण्य, बंदुका-तोफांसारखी आधुनिक हत्यारे यामुळे इंग्रजांना मराठयांच्या आक्रमणापासून वाचता आले. परिणामी सतराव्या आणि अठराव्या शतकात मुंबईतून मसाल्याचे पदार्थ, कापूस, खनिज संपत्ती आदी कच्चा माल, सोने-चांदी आदी वस्तू इंग्लंडमध्ये पाठवण्याचा कंपनी सरकारने सपाटा लावला. भारतातील पैसा आणि कच्चा माल याच्या बळावर इंग्लंडात औद्योगिक क्रांतीचे भोंगे वाजू लागले होते. म्हणूनच आर्थिक उलाढालीचे केंद्र बनू लागलेल्या मुंबई बेटाचे वेगाने शहरात आणि पुढे महानगरात रूपांतर झाले.

मुंबईच्या जडणघडणीला खरा वेग १९ व्या शतकात मिळाला. इंग्रजांनी सबंध देशभरात आपली सत्ता प्रस्थापित केली होती. त्यामुळे भारताच्या आर्थिक पिळवणुकीचा त्यांना खुला परवाना मिळाला होता. भारतीय उद्योगधंदे नष्ट करून इंग्रजांनी स्थानिक बाजारपेठ काबीज केली होती आणि हा स्वस्तात कच्चा माल घेण्याचा आणि मनमानेल त्या भावात पक्का माल विकण्याचा धंदा सुलभ व्हावा यासाठी नवनवीन शोध, संशोधन आणि सुविधा शोधण्यात येत होत्या. तार, पोस्ट, रेल्वे आणि संरक्षण व्यवस्था मजबूत झाल्याने मुंबईचे स्वरूप १९ व्या शतकात पार बदलून गेले होते. १८५३ साली मुंबई ते ठाणे अशी रेल्वे सर्वप्रथम धावली. सबंध आशिया खंडातील त्या पहिल्या रेल्वेने मुंबईला ‘चाक्या म्हसोबा’ हा देव दिला, त्या वेळी वाफेच्या इंजिनावर चालणारी ती रेल्वे पाहायला शेकडो लोक लोहमार्गाच्या दुतर्फा उभे राहून ‘सायबाचा पो-या मोठा अकली, बिनबैलाने गाडी कशी ढकली?’ असा स्वत:लाच प्रश्न विचारीत. रेल्वेच्या आगमनाने मुंबई आणि मुंबईकरांच्या जगण्याला वेग प्राप्त झाला.

त्यापाठोपाठ १८६१-६५ दरम्यान घडलेल्या अमेरिकन यादवीने मुंबईला ख-या अर्थाने महानगर बनवले. या युद्धामुळे जागतिक अर्थकारणात झालेल्या उलथापालथीने मुंबईकर व्यापा-यांची अक्षरश: चांदी झाली आणि त्या श्रीमंतीतूनच मुंबईत गॉथिक पद्धतीच्या इमारती उभ्या राहिल्या. रेल्वे आणि गॉथिक शैलीच्या इमारती या दोन्हींची उभारणी व्यापा-यांच्या पैशातून झाली होती. आपण या शहराचे, या शहरातील लोकांचे काही तरी देणे लागतो या भावनेतून रुग्णालये, धर्मशाळा, शाळा-महाविद्यालये, वाचनालये, रस्ते असे एकाहून एक प्रकल्प या शहरात धनिकांच्या माध्यमातून उभे राहिले. त्यात जे धार्मिक होते, त्यांनी मठ-मंदिरे बांधण्यात आणि त्यांचे संवर्धन करण्यात पुढाकार घेतला, पण त्यांच्यापेक्षा प्रागतिक विचारसरणी असणा-या मानवतावादी श्रीमंतांची संख्या जास्त असल्यामुळे मुंबईचे व्यक्तिमत्त्वही उदार आणि सर्वसमावेशक बनले. फोर्टमधील डेव्हिड ससून वाचनालय, हे डेव्हिड आणि अल्बर्ट ससून या ज्यूधर्मीय धनवंत पिता-पुत्रांच्या देणगीतून आकारास आले.


सर्वसामान्य मुंबईकरांना कायद्याचे ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी जगन्नाथ शंकरशेट यांनी पुढाकार घेऊन ‘गव्हर्नमेंट लॉ कॉलेज’ची पायाभरणी केली. नाना तिथेच थांबले नाहीत, त्यांनी देशी लोकांना कायद्याची पदवी मिळावी यासाठी यशस्वी लढा दिला. आज ज्या शेठ लोकांनी मुंबईला आपली बटिक बनविण्याचा प्रयत्न चालवला आहे, ते सारे भारतीय कायद्याची हवी तशी पायमल्ली करताना दिसतात. त्या वेळी आमच्या नाना शंकरशेटयांच्या मनाच्या श्रीमंतीचे आणि उदारतेचे कौतुक वाटते. मुंबईच्या आरोग्य रक्षणार्थ जे.जे. रुग्णालय आले. टाटा उद्योग समूहाने तर टाटा मेमोरियल हॉस्पिटल, टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस, एनसीपीए टाटा थिएटर, टाटा इन्स्टिटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्चसारख्या उत्तमोत्तम संस्था स्थापून मुंबईला एक आर्थिक राजनाधी- सोबत एक वेगळी ओळख मिळवून दिली, पण जसा काळ बदलला तसे मुंबईचे श्रीमंत लोकही बदलले. त्यांनी भारतीय धर्मशास्त्रात आणि गांधी तत्त्वज्ञानात सांगण्यात आलेली ‘विश्वस्त’ ही संकल्पना बासनात गुंडाळून ठेवली, परिणामी नव्याने श्रीमंती लाभलेल्या मुंबईकरांनी आपली श्रीमंती आपल्या कुटुंबीयांपुरती मर्यादित ठेवण्यास सुरुवात केली. त्यामुळे आज मुंबईत सर्वसामान्य माणसाला चांगली सेवा देतील अशी रुग्णालये, डायलिसिस केंद्रे, कमी फीमध्ये उत्तम शिक्षण देतील अशा शाळा, महाविद्यालये, क्रीडा प्रशिक्षण केंद्रे, रोजगाराभिमुख प्रशिक्षण देणा-या तंत्रशाळा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सर्वागीण जीवनाचा अभ्यास करणारी संशोधन केंद्रे नव्याने उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी धनिकांच्या मुठीत अडकलेली लक्ष्मी, सहजपणे मोकळी होणे ही काळाची गरज आहे. रस्त्यावरचा मुंबईकर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही प्रामाणिकपणा जपतोय, हे एका आंतरराष्ट्रीय संस्थेच्या निरीक्षणातून स्पष्ट झाले आहे.⁠⁠⁠⁠

भारतावर सर्वाधिक काळ (४५० वर्षे) कोणत्या युरोपियन सत्तेने राज्य केले ?

Daily Quiz # २४९ 

भारतावर सर्वाधिक काळ (४५० वर्षे) कोणत्या युरोपियन सत्तेने राज्य केले ?

उत्तर :- पोर्तुगीज 

गोव्यात पोर्तुगीज सत्ता १० डिसेंबर १५१० पासून १८ डिसेंबर १९६१ पर्यंत म्हणजे ४५० वर्षं व ८ दिवस होती. त्यापूर्वी १७ फेब्रुवारी १५१० ते ३० मे १५१० म्हणजे ३ महिने १३ दिवस त्यांनी गोवा आपल्या ताब्यात ठेवलं होतं. एकूण ४५० वर्षं, ३ महिने व २१ दिवस त्यांनी गोव्यावर राज्य केलं.
गोव्याचा इतिहास हा एका पारतंत्र्यानं पीडलेल्या, आर्थिक मागासलेपणानं गांजलेल्या, हताश होऊन जे भोगवट्याला आलं आहे ते निमूट स्वीकारणा-या सोशीक जनसमूहाचा इतिहास आहे. अंधा-या खोलीत वर्षानुवर्षं कोंडून पडलेल्या माणसाला दरवाजा अचानक सताड उघडा झाल्यावर जे वाटेल, ते व तसंच मुक्तीनंतर गोव्याच्या जनतेला वाटलं असलं पाहिजे. फ्रेंच राज्यक्रान्तीच्या वेळी बंडखोरांनी बॅस्टिल व कॅसल तुरुंग फोडून वर्षानुवर्षं अंधारकोठड्यात खितपत पडल्या कैद्यांना मोकळं केलं, तेव्हा त्यांना कुठं जावं ते कळेना. ते भिरभिरले नि त्यातले बरेच जण आपापल्या कोठड्यात जाऊन पडून राहिले. तसंच काहीसं सुरुवातीला गोव्यातील एका विशिष्ट वर्गाचं झालं. स्वातंत्र्याचा अर्थ त्यांना कळायला काही वर्षं जावी लागली.

गोव्याचा इतिहास हा चारशेपन्नासच नव्हे, तर दोन सहस्र वर्षांहून अधिक काळाचा पारतंत्र्याचा इतिहास आहे, असं म्हटलं, तर अतिशयोक्ती होणार नाही. ख्रिस्तपूर्व तिस-या शतकात हा भाग ‘गोवापुरी’ म्हणून ओळखला जाऊ लागला. हे नाव त्याला कोणत्यातरी मिथकामुळे मिळालं असेल वा बाहेरून झुंडीनं येऊन स्थायिक झालेल्या त्यावेळच्या रहिवाशांनी दिलं असेल. तितका जुना इतिहास आता ज्ञात होणं अशक्य आहे. ह्यानंतर गोवापुरीवर राज्य करणारा कुणी लढवय्या स्थानिकांतून निर्माण झाला होता, असं काही दिसत नाही. भोज, मौर्य, सातवाहन, चालुक्य, विजयनगर, कदंब अशा एकाहून एक पराक्रमी व समृद्ध राजवंशांनी गोव्यावर राज्य केलं, असा इतिहास सांगतो. चालुक्य इ. स. ५८० पासून ७५० पर्यंत राज्यावर होते. त्यानंतर कदंब आले. त्यांनी अकराव्या शतकापर्यंत राज्य केलं. हंपीच्या विजयनगर सम्राटांनी १३७० पासून शंभर वर्षं गोव्यात काढली. इ. स. १४६९ मध्ये दक्षिण भारतात धुमाकूळ घालणारी बहामनी मुसलमान सत्ता गोव्यात येऊन पोचली. विजापुराच्या आदिलशहाशी त्यांचा संघर्ष होत राहिला. १४९२ मध्ये आदिलशहानं आपला अंमल बसवला, पण तो जेमतेम १८ वर्षं टिकला.
कृष्णदेवराय व रामदेवराय ह्या विजयनगरच्या सम्राटांनी गोव्याला आर्थिक स्थैर्याकडे तर नेलंच, पण मोठी सांस्कृतिक देणगीही दिली. तथापि जिथं विजयनगरचीच मुसलमान लुटारूंकडून वारंवार लूट होऊ लागली, तिथं गोव्यासारख्या छोट्या प्रदेशावर त्यांची अधिसत्ता किती काळ व किती प्रभावानं टिकून राहणार ? त्यानंतर आलेल्या दोन मुसलमान सत्ताधीशांनी तर धुमाकूळ घातला. स्थानिक हिंदू जनतेच्या छळाला पारावार राहिला नाही. सुदैवाने गोवे बंदरातून होणा-या काळी मिरी व इतर मसाल्याच्या पदार्थांच्या निर्यातीला मात्र त्यामुळं धक्का लागला नाही. दक्षिण भारतातून हे पदार्थ मोठ्या प्रमाणात गोव्यामार्गे परदेशी रवाना होत.

वास्को-द-गामा (१४६९-१५२४)
वास्को-द-गामा (१४६९-१५२४)

     अशाच एका व्यापारी जहाजातून पोर्तुगीज सरदार वास्को-द-गामा ( १४६९-१५२४) २० मे १४९८ रोजी कालिकत बंदरात येऊन दाखल झाला. गोव्याला भेट देऊन तो २९ ऑगस्टला परत गेला. त्यानंतर १२ फेब्रुवारी १५०२ ला तो मोठं आरमार घेऊन परत आला. रेशीम व सोने यांची लुटालूट करून परत गेला. इ. स. १५०५ मध्ये पोर्तुगीजांनी केरळ किनारी कोची इथं आपलं व्यापारी ठाणं वसवलं होतं. त्याला त्यांनी ‘इंडिया पोर्तुगीजा’ आणि ‘ इस्तोदो द इंडिया’ अशी नावं दिली होती. व्यापाराच्या निमित्तानं वसाहत उभारता येईल का, हे पाहण्यासाठी त्यांनी तिथं एक व्हाईसरॉयही नेमला होता. १५२४ मध्ये वास्को-द-गामा त्याच्याकडून व्हाईसरॉय पदाची सूत्रं घेण्यासाठी पोर्तुगालहून आला. पण कोची इथं आजारी पडला. तिथंच त्याचं काही दिवसात निधन झालं. कोचीमधील सेंट फ्रान्सिस चर्चमध्ये त्याचं दफन करण्यात आलं. पुढे १५३९ मध्ये त्याचे अवशेष पोर्तुगालला हलवण्यात आले.

     वास्को-द-गामा हा स्वभावतः अत्यंत क्रूर होता. मसाल्यांची निर्यात करण्याच्या मिषाने तो येई व आशियातील स्थळांची, वसाहती निर्माण करण्यासाठी,  पाहणी करून जाई. वाटेत तो समुद्रावर चाचेगिरी करी. एकदा त्याने मक्केहून परत येणा-या मुसलमान यात्रेकरूंच्या जहाजावर हल्ला चढवला व ४०० यात्रेकरूंची – त्यात स्त्रिया व अजाण बालकेही होती – निर्घृण हत्या केली. तो लढवय्या नव्हता. एक दुष्ट लुटारू होता. वसाहती निर्माण करण्याच्या कामावर पोर्तुगीज राजानं दुस-याच एका शूर सरदाराची नेमणूक केली होती.

अफ़ॉन्स-द-अल्बुकर्क (१४५३- १५१५)
अफ़ॉन्स-द-अल्बुकर्क (१४५३- १५१५)

     गोव्यावर जवळजवळ ४० वर्षं मुसलमानी सत्ता होती. मात्र  त्या काळात मोठ्या संख्येनं हिंदूंचं धर्मान्तर झाल्याचं दिसत नाही. शिवरायांची हिंदुपदपादशाही उदयाला यायला अजून दीडशे वर्षं अवधी होता, पण गोव्याला लागून उत्तरेला सावंतवाडीकरांसारखे हिंदू राजे राज्य करीत होते. त्यांचा थोडासा वाचक आदीलशाहीला होताच. त्यात हिंदूंचा एक नेता थिमय्या कर्नाटकात राहून अफ़ॉन्स द अल्बुकर्क ह्या पोर्तुगीज आरमारी सेनानीशी संधान बांधून होता. अल्बुकर्क ( १४५३-१५१५) हा धाडशी व महत्वाकांक्षी असला त्याला तरी राजकीय तारतम्याची जाण होती. मुसलमानी सत्तेविरुद्ध आक्रमण करताना बहुसंख्य हिंदूंना विश्वासात घ्यायची आवश्यकता त्यानं जाणली होती. इ. स. १५१० च्या सुरुवातीस अचानक धाड घालून त्यानं गोवा काबीजही केला होता. पण तीन साडेतीन महिन्यात आदीलशाही फौजेनं त्याला हुसकावून लावलं होतं. त्या अपमानाचा सूड तो कधीतरी घेणारच होता. थिमय्याकडून हिंदूंच्या सहकार्याची हमी त्याला मिळाली होती. दुस-या खेपेला तो आला, तो पूर्ण तयारीनिशीच. ३४ युद्धनौका, १५०० गोरे पोर्तुगीज सैनिक व ३०० भाडोत्री मलबारी सैनिक घेऊन तो अरबी समुद्रात आग्वाद किल्ल्याबाहेर नांगर टाकून बसला होता. थिमय्याच्या एका सारस्वत ब्राह्मण हेराने जीव धोक्यात घालून १० डिसेंबर १५१० रोजी त्याला आदिलशहाच्या सेनेबद्दल प्रत्यक्ष तिकडे जाऊन माहिती दिली. तसं पोर्तुगीज आरमार महादेवी ( मांडवी ) नदीत घुसलं नि त्यानं रात्रीच्या काळोखात (जुने) गोवे बंदरावर हल्ला चढवला. बेसावध असलेल्या आदीलशाहाच्या सैनिकांना तर पोर्तुगीज सैनिकांनी कालवून काढलंच ; पण राजधानीत राहाण-या निरपराध मुसलमान नागरिकांचीही  निर्घृण हत्या केली. आदिलशाही राजवटीखाली असलेल्या तिसवाडी, साष्टी व बार्जेरचा काही भाग काबीज करायला पोर्तुगीजांना फार वेळ लागला नाही. जे मुसलमान नागरिक बचावले, ते उत्तरेकडील सत्तरी व दक्षिणेकडील काणकोण भागाकडे पळाले. त्यांचे वंशज पिढ्यानपिढ्या त्या भागात राहात आहेत.

     गोव्यात पाय रोवल्यानंतर पोर्तुगीजांनी दमण, दादरा नगर हवेली, वसई, मलाक्का, होर्मुज व मकाव येथे वसाहती स्थापन केल्या. दीव हे सौराष्ट्रातील चिमुकलं बेट १५०५ पासूनच पोर्तुगीजांच्या ताब्यात होतं. १५१५ मध्ये बोटीवर असतांनाच अल्बुकर्क आजारी पडून निधन पावला. त्याचं शव गोव्यात आणून जुने गोवे येथील सेमिनरीत दफन करण्यात आलं. त्यानं हिंदूंना अभय दिलं होतं. त्यामुळंच त्याच्या हयातीत हिंदूंना फारसा त्रास झाला नाही. पण त्याच्या निधनानंतर हिंदूंच्या छळाला प्रारंभ झाला. काही सधन उच्च्वर्णीय हिंदू कुटुंबं दक्षिणेला कर्नाटक प्रदेशात पळून गेली. पण बहुसंख्य गरीब जनतेला जुलूम जबरदस्तीला तोंड देत गोव्यातच राहावं लागलं.
गोव्याची पूर्वापार धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक ओळख नष्ट करण्याचा सर्वतोपरीनी प्रयत्न केला. त्याला रोमन कॅथॉलिक चर्चने भरघोस पाठिंबा दिला. रोमहून फ्रान्सिकन व जेज्युइट धर्मप्रसारक २५-३० वर्षांच्या आत गोव्यात येऊन दाखल झाले. ज्याला गोमंतकीय ख्रिश्चन लोक हे संत मानतात, तो जेज्युइट पाद्री फ्रान्सिस झेवियर  १५४२ साली आला व १५५२ साली निधन होईपर्यंत त्याने मोठ्या प्रमाणात गरीब असहाय हिंदूंचं जबरदस्तीनं धर्मान्तर घडवून आणलं.
फ्रान्सिस झेवियर  ( १५०६ - १५५२)
फ्रान्सिस झेवियर  ( १५०६ – १५५२)

     त्याचं शव बाम जीजस चर्चमध्ये जतन  करण्यात आलेलं आहे. इ. स. १५६० मध्ये युरोपमधून ‘इन्क्विझिशन’ ह्या भयानक न्यायमंदिराचं आगमन झालं आणि हिंदूंच्या छळाला सीमाच उरली नाही. हिंदू प्रजेपैकी जवळजवळ ३०-३५ टक्के लोकांना ख्रिस्ती बनवण्यात आलं होतं. ते आपला नवा धर्म नीट पाळतात की नाही ह्याची इन्क्विझिशन पाहणी करत असे. त्यांच्या जाचक नियमावलीनुसार जे कुणी गुन्हेगार ठरत, त्यांना ‘आल्तु-द-फॅ’ नावाच्या सार्वजनिक उत्सवात जिवंत जाळून मारलं जाई. उर्वरित हिंदू जनतेवर निरनिराळ्या प्रकारचे कर लादले गेले होते. डोईवर शेंडी ठेवली, तर सरकारला कर द्यावा लागे. देवळं तर नष्ट झालीच होती. पण घरातले देवसुद्धा पोर्तुगीज पोलीस घराघरात घुसून बाहेर फेकून देत. ‘इन्क्विझिशन’चा हा जुलूम इ. स. १८९२ पर्यंत म्हणजे अडीचशे वर्षांहून अधिक काळ चालला. यावरून गोमंतकीय हिंदूंनी किती छळ सोसला असेल, याची कल्पना येते.

     एक प्रज्ञावंत देशभक्त डॉ. त्रिस्तांव द ब्रॅगांझा कुन्हा (१८९१-१९५८) यांनी ह्या काळाबद्दल आपल्या ‘ डीनॅशनलायझेशन ऑफ गोअन्स’ या पुस्तकात लिहिले आहे, ” पोर्तुगीजांनी निर्दयतेने आमची पारंपारिक संस्कृती नष्ट केली. पण कोणतीही चांगली पर्यायी संस्कृती ते आम्हाला देऊ शकले नाहीत. आमच्या सांस्कृतिक जीवनात कोणतेही मूळ नसलेले असे एक संस्कृतीचे केवळ हास्यास्पद रूपांतर मात्र त्यांनी आमच्यावर जुलुमाने लादले. ह्या बनावट संस्कृतीने आमच्या सहजप्रवृत्त प्रगतीला बाधा तर आणलीच; पण आम्हाला एक संस्कृतिहीन अवस्थेला नेऊन सोडले. यातून सुटका करून घ्यायचा एकच उपाय आहे नि तो म्हणजे ह्या रानटी पद्धतीने घुसवण्यात आलेल्या संस्कृतीचा त्याग करून हिंदी परंपरेकडे परत जायचे. “
अशा भयानक परिस्थितीतून जाऊनही गोमंतकातील बहुसंख्य जनतेनं आपली संस्कृती व भाषा टिकवण्याचा निकराचा प्रयत्न केला, हे अधोरेखित व्हावं म्हणून. भाषेच्या दृष्टीनं पाहिलं तर गोव्यावर प्राकृत-अपभ्रंश व थोड्याफार प्रमाणात कानडी भाषांचा प्रभाव ख्रिस्तोत्तर एक हजार वर्षं तरी होता, तरीही साधारण सहाव्या-सातव्या शतकात जेव्हा मराठी भाषेची निर्मिती झाली, त्यावेळी पश्चिम कोकणपट्टीत यादवांचं राज होतं. यादव मराठी भाषक होते. संलग्न असलेल्या गोवापुरीतील लोकांतही मराठी भाषेचा प्रसार व्हायला वेळ लागला नाही. आठव्या शतकात कदंब राजांची सत्ता सुरू झाली टी अकरावं शतक संपेपर्यंत कायम होती. त्या काळातही मराठीनं आपलं स्थान सोडलं नाही. मुसलमानी राजवटींनी स्थानिक भाषेत काही ढवळाढवळ केली नाही. एवढंच की मराठीबरोबर कानडीचाही थोडासा प्रभाव गोवापुरीतील लोकांवर होता. ‘गोयकानडी’ नावाची एक संकरित भाषा साष्टी आणि तिसवाडी भागात कागदोपत्री वापरली जात असे. पोर्तुगीजांनी सुरवातीला हा भाग काबीज केला तेव्हा कागदोपत्रांवरून त्यांचा असा समज झाला की गोव्यात लोक जी भाषा बोलताहेत, ती कानडी आहे. ती कोकणी-मराठी आहे याचं ज्ञान अनेक वर्षं त्याना झालं नव्हतं. परिणामी जेज्युइट व फ्रान्सिस्कन धर्मोपदेशक आल्यावर त्यांनी गोव्यातील भाषेला ‘लिंग्विया कानरीम’ असं नाव दिलं. ते सतराव्या शतकापर्यंत कायम होतं.

     मधल्या काळात इंग्लंडहून काही जेज्युइट पाद्री गोव्यात आले. त्यात फादर स्टीफन्सचा समावेश होता. ब्रिटिशांचा व्यापारनिमित्ताने भारतातील मराठी भाषक भागांशी परिचय झाला होता. त्यांनी तात्काळ ओळखलं की गोव्यात लोक जी भाषा बोलताहेत ती  कानडी नसून मराठी आहे.

     अर्थात याच्याशी पोर्तुगीज राज्यकर्त्यांना काही देणंघेणं नव्हतं. पूर्वापार चालत आलेल्या भाषा व संस्कृतीचा विकास घडवून आणावा, स्थानिकांना आधुनिक व शास्त्रीय विद्या द्यावी, अंधश्रद्धा दूर कराव्यात, वगैरे गोष्टी त्यांनी जाणीवपूर्वक केल्या नाहीत, असं म्हणण्याऐवजी त्यांना स्वतःलाच ती दृष्टी नव्हती, ते मागासलेले होते, असं मानायला बरीच जागा आहे. इतर युरोपीय देशांच्या मानाने त्या काळात पोर्तुगाल हा सर्वच बाबतीत एक मागासलेला देश होता. पुढे ‘रिनेसन्स’च्या व औद्योगिक क्रान्तीच्या काळातही तो देश मागेच होता. तेव्हा गोव्यात काही सुधारणा ते करतील याचा संभवत नव्हता. वांशिक व धार्मिक श्रेष्ठत्वाच्या अहंकाराने पछाडलेले ते राज्यकर्ते होते. सांस्कृतिक व भाषिक बाबतीत फक्त आपल्या देशाला व धर्माला हितकारक होईल एवढंच त्यांनी केलं व स्थानिक प्रजेच्या एका घटकाला पारतंत्र्याची ‘चटक’ लावली.जमीनसुधारणा करणं, निरनिराळ्या पिकांच्या लागवडी करणं, दूधदुभत्या जनावरांची  पैदास करणं, शिक्षणसंस्था उभारणं, नोक-या  मिळवून देणं ह्या गोष्टी त्यांच्या हिशोबीच नव्हत्या. जनता निर्धन राहावी, अशिक्षित राहावी, सतत गांजलेली असावी, खायला दोन घास मिळावेत म्हणून धर्मान्तराला तयार व्हावी, असं धोरण राबवण्यात त्यांनी आपल्या कारकिर्दीची सर्व वर्षं खर्ची घातली. पोर्तुगीज काळात गोव्यामध्ये एकही धंदा उभारला गेला नाही. एकोणिसाव्या शतकात अनेकांनी शिक्षणासाठी व नोक-यांसाठी इंग्रज शासित भारतीय प्रदेशात स्थलांतर केलं. बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या मुंबई, पुणे, बेळगाव, धारवाड, मंगळुरु वगैरे ठिकाणी गोवेकर शिक्षण व नोक-यांसाठी गेले. बरेच जण तिकडेच राहिले. ज्यांना जाता येणं शक्य नव्हतं ते अज्ञान, जुलूम, जबरदस्ती यात भोवंडत गोव्यातच राहिले. आंबे, सुपारी, नारळ, अननस, काजू अशी जी काही नैसर्गिकरित्या मुबलक पैदा  होणारी  फळं होती त्याला बाजारपेठ नव्हती. अर्थाजनासाठी त्यांचा उपयोग नगण्य होता. पश्चिम किना-याप्रमाणे इतर कोकम प्रदेशांप्रमाणे गोव्याची जमीनही भात, नाचणी व तत्सम उत्पादनाला उपयुक्त होती. ती कशी सुधारावी याचं ज्ञान स्थानिकांना नव्हतं आणि पोर्तुगीज शासन त्याबद्दल जाणीवपूर्वक उदासीन होतं. धान्यधुन्य, भाज्या, दूध वगैरे गोष्टीसुद्धा शेजारच्या बेळगाव, कारवार, रत्नागिरी अथवा कोल्हापूर जिल्ह्यातून आयात कराव्या लागत त्या अगदी गोवा मुक्तीपर्यंत.
     इ. स. १९१० मध्ये पोर्तुगालमध्ये लोकशाही प्रस्थापित होईपर्यंत हिंदूंवर कडक निर्बंध होते. सार्वजनिक उत्सवांना तर मनाई होतीच; पण घरच्या गणेशमूर्तीचं विसर्जन रात्र पडल्याशिवाय करता येत नव्हतं. गणेशविसर्जन मध्यरात्रीच्या सुमारास करायची ती पद्धत एक परंपरा म्हणून काही ठिकाणी अजूनही पाळली जाते. इ. स. १८१२ मध्ये ‘इन्क्विझिशन’ उठल्यानंतर गोव्यात मोठ्या प्रमाणात सामूहिक धर्मान्तर असं झालं नाही. ते चालू राहिलं असतं तर रोमन कॅथॉलिकांची लोकसंख्या, जी मुक्तीच्या वेळी साधारण ३०-३५ टक्के होती, ती कितीतरी अधिक झाली असती.

     स्थानिक भाषेत शिक्षण देण्यावर पोर्तुगीजानी बंदीच घातली होती. पोर्तुगीज भाषा शिकण्यासाठी काही थोड्या शाळा उघडल्या. पण त्यात प्रवेश मिळवायला धर्मान्तर ही अट होती. त्यामुळं बहुसंख्य जनता एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत शिक्षणापासून वंचितच राहिली. कायदा थोडा शिथिल झाल्यावर ब्रिटिश प्रदेशातून शिक्षण प्राप्त करून आलेल्या काही गोमंतकीयांनी स्वखर्चाने शाळा उघडायला सुरुवात केली. ह्या सर्व शाळा मराठी माध्यमातून शिक्षण देणा-या होत्या. कोकणीभाषी शिक्षणसंस्था ही संकल्पनाच त्यावेळी अस्तित्त्वात नव्हती. कोकणी घराघरात व रस्तोरस्ती बोलली जात असे. पण लिहिली जात नसे. ती बोलीभाषा आहे हे सर्व गोमंतकीयांना पोर्तुगीज काळात मान्य होतं. कोकणीच्या वेगळेपणाचा साक्षात्कार शणै गोयंबाब यांना मुंबईत झाला. ते लोण मग मुक्तीनंतर गोव्यात आलं.

गोमंतकीयांनी पोर्तुगीजकाळात व त्यानंतर आजतागायत मराठीवर अलोट प्रेम केलंय. त्यामुळं गोमंतकीय हिंदू हा महाराष्ट्रातील मराठी भाषकांहून सांस्कृतिक व भाषिक बाबतीत केव्हाच वेगळा भासत नाही. मराठी भाषा गोमंतकीय हिंदूंच्या रक्तात भिनली आहे. ती त्याला जन्मतःच येते, शाळेत शिकावी लागत नाही. खेडोपाडीचे लोकही शुद्ध मराठी बोलू शकतात. मराठी गाणी, आरत्या, भजनं गाऊ शकतात. देवळाच्या जत्रेत मराठी नाटकं होतात. स्वतःला कोकणीवादी म्हणवून घेणारे हिंदूही अत्यंत शुद्ध व सुंदर मराठी बोलतात, वाचतात व लिहितात. एकाच घरात वडील मराठीवादी तर मुलगा कोकणीवादी, एक भाऊ  मराठीवादी तर दुसरा कोकणीवादी, अशी उदाहरणं अनेक आहेत.

     गोव्यात मराठीचं महत्त्व टिकून राहण्यात काही ख्रिश्चन धर्मगुरुंचं योगदानही कारणीभूत आहे, ही गोष्ट नाकारता येणार नाही. फादर थॉमस स्टीफन ( १५४९-१६१९) हा ब्रिटिश धर्मगुरू १५७९ मध्ये गोव्याला आला. त्यानं मराठीचा अभ्यास केला व कृष्णदास शामा विरचित ‘श्रीकृष्णचरित्रकथा’ ह्या ग्रंथाच्या धर्तीवर रोमन लिपीत मराठी भाषेमध्ये ‘ख्रिस्तपुराण’ ह्या ग्रंथाची निर्मिती केली. त्यात त्याने मराठीची स्तुती करताना कोणतीही उपमा-उत्प्रेक्षा हातची राखून ठेवली नाही. हा १०९६२ ओव्यांचा ग्रंथ ‘ज्ञानेश्वरी’हूनही मोठा आहे. त्याची देवनागरीतील आवृत्ती १९५६ मध्ये शांताराम बंडेलू यांनी संपादित करून प्रसिद्ध केला आहे.

     पोर्तुगिजांच्या जुलमी राजवटीतसुद्धा देवनागरी टिकून राहिली ती असामान्य प्रतिभा  लाभलेल्या काही गोमंतकीयांमुळंच. कृष्णदास शामा ह्या आद्य कवीकडून स्फूर्ती घेऊन अभिजात काव्याची निर्मिती करणारे कवी होते महेश्वरभट्ट सुखटणकर, सोहिरोबानाथ आंबिये, विठ्ठल केरीकर, कृष्णंभट बांदकर व त्यांचे पुत्र मुकुंदराज, गोकुळाबाई तळावलीकर, रुक्मिणीबाई केंकरे ‘सोंसुबाई’, गोदावरीबाई नायक, सीताबाई धेंपे-कुंडईकर वगैरे. एकोणिसाव्या शतकात व त्यानंतर लक्ष्मणराव सरदेसाई, वि. स. सुखटणकर, ना भा नायक, पु. मं. लाड, पं. महादेवशास्त्री जोशी, व्यंकटेश अ. पै-रायकर, बा. द. सातोस्कर, अ. का. प्रियोळकर, यशवंत सूर्यराव सरदेसाई, जयंतराव सरदेसाई, बा. भ. बोरकर, दा. अ. कारे, शंकर रामाणी, मनोहर सावळाराम नाईक वगैरे ज्येष्ठ साहित्यिकांनी देवनागरी मराठीची पाळेमुळे आपल्या बहारदार लेखनानं घट्ट करून टाकली. ही ध्वजा खांदयावर घेऊन आजसुद्धा गोमंतकीय मराठी साहित्यिक दमदार वाटचाल करीत आहेत. मराठी भाषकांनी ह्या प्रतिकूल परिस्थितीत मराठी साहित्याला योगदान करणा-या गोमंतकीय लेखक-कवींचे ऋणी राहिलं पाहिजे.⁠⁠⁠⁠

सर्वात जुना संपुर्ण छापील ग्रंथ कोणता मानण्यात येतो ?

Daily Quiz # २४८

सर्वात जुना संपुर्ण छापील ग्रंथ कोणता मानण्यात येतो ?

वज्रच्छेदिकाप्रज्ञापारमितासूत्र हे भगवान बुद्धांनी निर्दोष ज्ञान अनुभूती (Perfection of wisdom) करून घेण्याबद्दल मार्गदर्शन केलेले एक आख्यान किंवा प्रवचन आहे. या ग्रंथाचे मूळ संस्कृतमधले संपूर्ण नाव 'वज्रच्छेदिकाप्रज्ञापारमितासूत्र,' असे आहे. परंतु लघु स्वरूपात वज्र सूत्र किंवा डायमंड सूत्र(Diamond Sutra) या नावाने ते ओळखले जाते.
संपूर्ण स्वरूपात उपलब्ध असलेला हा सर्वात प्राचीन छापील ग्रंथ आहे असे मानले जाते.

मुख्य तत्व
या सूत्राचे मुख्य तत्व असे आहे की हे सर्व लौकिक जग भ्रामक आणि मिथ्या आहे त्यामुळे या जगात कोणत्याच वस्तू किंवा व्यक्ती नाहीत. एक मूळ तत्व सोडले तर दुसरे काहीच नसल्याने सजीव, निर्जीव असे काहीच नाही व त्यामुळे सुख दुख: वगैरे प्रत्यक्षात काहीच नाही.

एशिया खंडातले चीन, भारत, इराण या सारखे देश आणि भूमध्य युरोपियन देश यांच्यामधे जी काही व्यापारी व सांस्कृतिक देवाणघेवाण प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडात होत असे ती 7000 मैल लांबवर पसरलेल्या एका मार्गानेच प्रामुख्याने होत असे. व्यापारी, धर्मप्रचारक, भटके टोळीवाले आणि सैनिक याच मार्गानेच जा ये करत. निरनिराळ्या प्रकारची मालवाहतुक या मार्गावरून होत असली तरी प्रामुख्याने रेशमी वस्त्र, कस्तुरी, सुगंध, औषधे,, रत्ने, मसाले, काच सामान वगैरेसारख्या ऐषारामाच्या वस्तूंचा व्यापार या मार्गावरून होत असल्याने या मार्गाला रेशीम मार्ग किंवा Silk Road असे नाव पडले. हा रेशीम मार्ग किमान 3000 वर्षे तरी वापरात होता. चीनमधल्या शियान या गावापासून सुरू होणारा मार्ग चीन, कझागस्तान, इराण, इराक या मार्गे रोमन साम्राज्याच्या सीमेपर्यंत पोचत असे तर दुसरा फाटा इराण, अफगाणिस्तान या मार्गाने भारतापर्यंत पोचत असे. या मार्गाने प्रवास करणारे व्यापारी वगैरेंच्या सोईसाठी ठिकठिकाणी सराया, पाणपोई वगैरे गोष्टी निर्माण केल्या गेल्या होत्या.

1900-01, 1906-08 आणि 1913-16 या वर्षांमधे त्या काळचा सर्वात नावाजलेला व प्रसिद्ध पुराण वस्तू संशोधक (Archaeological explorer) सर ऑरेल स्टाइन याच्या नेतृत्वाखाली तीन प्रमुख उत्खनन मोहिमा या रेशीम मार्गावर पर पाडल्या गेल्या. या तिन्ही मोहिमा मिळून ऑरेलने 25000 मैलांची पायी भ्रमंती केली. 

काश्मिर, अफगाणिस्तानमधल्या हिमालयांच्या रांगा किंवा Takalamakan’, ‘Lop-Nor’ आणि ‘Gobi’ यासारखी भयानक वाळवंटे त्याने व त्याच्या टीमने अनेक वेळा ओलांडली. अनेक जीवघेण्या प्रसंगातून तो पार पडला. या सगळ्यातून अनेक कलाकुसर केलेल्या वस्तु, रेशमी फलक, पुस्तके आणि रंगवलेली लाकडी पॅनेल्स त्याने शोधून काढली. 

ऑरेलचा सर्वात महत्वाचा शोध म्हणजे ‘मोगाओ‘ किंवा 1000 बुद्धांच्या गुहा! चीमधल्या गान्सू प्रांतातले दुनहुआंग हे शहर जुन्या रेशीम मार्गावर आहे. या ठिकाणी असलेल्या प्राचीन गुहांची माहिती ऑरेल स्टाइनला मिळाली. त्यावेळी वांग युआन्लू नावाचा एक भिक्खू या ठिकाणाची देखभाल करत असे.

ऑरेलने या भिक्खूला आपलेसे केले व केवळ 220 ब्रिटिश पौंडांना या ठिकाणी असलेले अनेक दस्ताऐवज, चित्रे, रेशमी फलक खरेदी केले.
या ठिकाणी मिळालेल्या दस्ताऐवजात, या सर्व कागदपत्रांचा मेरूमणी शोभेल असा एक ग्रंथ स्टाइनला मिळाला. 

11 मे 868 या दिवशी (1143 वर्षांपूर्वी), जाड कागदावर छपाई केलेला हा ग्रंथ कागदाच्या सलग गुंडाळीवर लाकडी ब्लॉक्स छपाई करून छापलेला आहे. ही कागदाची गुंडाळी तब्बल 16 फूट लांब आहे. हा ग्रंथ आहे, महायान बुद्धपंथीय ज्याला अतिशय पवित्र ग्रंथ असे मानतात ते 'वज्र सूत्र' किंवा डायमंड सूत्र. इ.स 520 मध्ये चिनी भिख्खू शुएन झांग हा मुख्यत: हे वज्र सूत्र मूळ स्वरूपातून मिळवण्यासाठी चीनहून भारतात खुष्कीच्या मार्गाने आला होता. अर्थात मोगाओ गुंफात मिळालेला हा ग्रंथ, शुएन झांगने भारतातून नेलेल्या मूळ ग्रंथाबरहुकूम आहे किंवा नाही हे सांगणे कठिण आहे. या ग्रंथाच्या सुरूवातीला भगवान बुद्ध, सुभूती या एका व्यक्तीला इतर भिख्खूंच्या उपस्थितीत मार्गदर्शन करत असल्याचे चित्र देखील आहे.

या ग्रंथाचे मूळ संस्कृतमधले संपूर्ण नाव 'वज्रच्छेदिकाप्रज्ञापारमितासूत्र,' असे आहे. परंतु लघु स्वरूपात वज्र सूत्र किंवा डायमंड सूत्र(Diamond Sutra) या नावाने ते ओळखले जाते. बौद्ध सूत्रे ही मुखोद्गत करून धार्मिक भक्तीभावाने उच्चारण करावयाची असल्याने, ती उच्चारणार्याने आपले मुख व शरीर सर्वात प्रथम पवित्र कसे करून घ्यावे या बद्दलच्या सूचना या सूत्रात दिलेल्या आढळतात.

हे सूत्र म्हणजे भगवान बुद्धांनी दिलेले एक आख्यान किंवा प्रवचन आहे. उत्तर हिंदुस्थानातील एका वाटिकेत, एक सह्स्त्र बौद्ध भिख्खू ज्याचा भाग होते अशा एका मोठ्या जनसमुहासमोर बुद्धांनी हे प्रवचन केलेले आहे. या समुहामध्ये असलेली 'सुभूती' या नावाची एक व्यक्ती, बुद्धांना त्यांनी या जनसमुहाला निर्दोष ज्ञान अनुभूती (Perfection of wisdom) कशी करून घ्यावी? या बद्दल मार्गदर्शन करावे अशी विनंती करते. व त्याच्या विनंतीला मान देऊन, बुद्धांनी हे वज्र सूत्र सांगितलेले आहे.

या सूत्राचे मुख्य तत्व असे आहे की हे सर्व लौकिक जग भ्रामक आणि मिथ्या आहे त्यामुळे या जगात कोणत्याच वस्तू किंवा व्यक्ती नाहीत. एक मूळ तत्व सोडले तर दुसरे काहीच नसल्याने सजीव, निर्जीव असे काहीच नाही व त्यामुळे सुख दुख: वगैरे प्रत्यक्षात काहीच नाही. बुद्धांना अशी विचारणा होते की गंगा नदीत किती वाळूचे कण असतील? बुद्ध यावर उत्तर देतात की जेवढे वाळूचे कण आहेत तेवढ्याच गंगा नद्या जगात आहेत असेही म्हणता येईल. पण प्रत्यक्षात वाळूचे कणही नाहीत आणि गंगा नदीही नाही. सर्व जगच एक भ्रम आहे आणि हा प्रश्न विचारणारी व्यक्ती सुभूती, ही सुद्धा एक भ्रमच आहे.

भगवान बुद्ध आपल्या आख्यानात पुढे म्हणतात की बौद्ध धर्मात प्रचलित असलेली व हे लौकिक जग एक भ्रम व मिथ्य आहे हे सांगणारी अनेक सूत्रे आहेत. भ्रम किंवा मिथ्य यांच्यावर विजय मिळवण्यासाठी आवश्यक अशा निर्दोष ज्ञान अनुभूतीचे वज्र हे केवळ एक चिन्ह असल्यामुळे, या सूत्रात वर्णिलेल्या विचारविनिमयाला, 'निर्दोष ज्ञान अनुभूतीचे वज्र सूत्र' (Perfection of Wisdom Diamond Sutra) या नावाने पुढे ओळखले जावे. अर्थात या सूत्राला दिलेले वज्र सूत्र हे नाव सुद्धा तसे बघायला गेले तर मिथ्याच आहे. हे सर्व आणि बुद्धांचे विचार ऐकल्यावर सुभूतीच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले असे हे 'वज्र सूत्र' पुढे म्हणते.
स्टाइनने हा 'वज्र सूत्र' ग्रंथ, परत भारतात आल्यावर ब्रिटिश म्युझियमला देऊन टाकला. व गेली 100 वर्षे तो तेथेच आहे. 


काही दिवसांपूर्वी ब्रिटिश लायब्ररीने त्यांच्याकडील असे काही महत्वाचे ग्रंथ जालावर उपलब्ध करून दिले आहेत. त्यात 'वज्र सूत्र' हा ग्रंथ देखील आहे. मूळ ग्रंथ गुंडाळीवर छापलेला असून तो गुंडाळी उलगडत डावीकडून उजवीकडे वाचत जायची आहे. आंतरजालावर हा ग्रंथ 5 चित्रपृष्ठे या स्वरूपात आहे. या पुस्तकात शेवटी " वांग जि याने आपल्या माता-पित्यांच्या वतीने शियान्टॉन्ग च्या 9व्या वर्षातील 4थ्या पंधरवड्यातील पोर्णिमेला हे पुस्तक अत्यंत भक्तीभावाने सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून दिले आहे" असा उल्लेख आहे. ही तारीख 11 मे 868 अशी येते. त्यामुळे संपूर्ण स्वरूपात उपलब्ध असलेला हा सर्वात प्राचीन छापील ग्रंथ आहे असे आज मानले जाते.⁠⁠⁠⁠