Tuesday, 27 June 2017

प्रति तानाजी म्हणून कोण ओळखला जातो ?

Daily Quiz # २४४

प्रति तानाजी म्हणून कोण ओळखला जातो ?

उत्तर : प्रति तानाजी - सरदार नावजी लखमाजी बलकवडे

उत्तर शिवकालत सिंहगड, राजगड, पुरंदर रायगड यासारखे बुलंद किल्ले मोगलांच्या ताब्यात गेल्याने मराठ्याना देशावर प्रभावी हालचाली करणे अवघड जात होते. त्याच बरोबर कोकनात देखील प्रतिकारात अडथळे निर्माण होऊ लागले होते..अशा बिकट परिस्थितिवर मात करण्यासाठी हे बलदंड किल्ले परत जिंकणे आवश्यक होते.या सर्व गोष्टींचा विचार करुन इ.स.१६९३ मध्ये शंकराजी नारायण सचिव यांनी धाडसी लोकांच्या सहाय्याने किल्ले जिंकण्याचे विचार सुरु केला.या काळात अनेक शुरवीरांचा उदय झाला, त्यापैकिच एक नाव सरदार नावजी लखमाजी बलकवडे....त्यांनी सिंहगड जिंकुन देण्याचे कबुल केले. ट्य बदल्यात शंकराजी पंतानी
त्यांना पवन मावळातील सावरगाव इनाम द्यायचे असे ठरले.. नावजी हे सचिवांच्या पायदळात पदाती पंचसहस्त्री होते.

शंकराजी पंताना सिंहगडाच्य भौगोलिक परिस्थितिचा चांगला अंदाज होत. हे काम नावजीसारख्या एकट्या दुकट्यचे नाही हे त्यांनी जाणले. आणि नावजी बरोबर, सरदार विठोजी कारके याना मदत्नीस म्हणुन दिले..त्यानुसार प्रथम विठोजीनी एकट्यने आणि नंतर विठोजी आणि नावजी दोघांनी सिंहगडाच्या घेराची तपासणी केली.

त्यांना असे आढळले की सिंहगड आधीच कठीण, त्यात मोगलांनी सावध होउन काही ठिकाणी किल्ल्यची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती करुन तेथे चौक्या, पहारे आणि रात्रिच्या गस्ती वाढवलेल्या होत्या. शिवाय जास्तीचे सैन्य देखिल या काळात किल्ल्यवर तैनात होते.दगा फ़टका करुन किल्ल घेण्याची सोय राहिली नव्हती.त्यामुळे सुभेदार मालुसरेनां जेव्हढ्या अडचणी आल्या तेव्हढ्याच आता पण असणार याचे जाण पंतसचीव, नावजी आणि विठोजी यांना होती.

दि. २५ जून १६९३ रोजी नावजी बलकवडे आणि विठोजी कारके यांनी निवडक माणसे घेतली आणि ते राजमाचीवरुन निघाले. पावसाळ्याचे दिवस..त्यात अंधार अशा स्थितीत मराठे रान तुडवत सिंहगडानजिकच्या जंगलात येउन पोहोचले आणि योग्य संधीची वात बघत ५ दिवस दबा धरुन बसले.

दि. ३० जूनच्या मध्यरात्री नावजी शिड्या व दोर बरोबर घेउन सिंहगड चढु लागले. अवघड मार्गानी खाचा-खळग्यातुन ते तटबंदीच्या खाली आले. परंतु किल्ल्यवर मोगलान्चे गस्त सुरु होती आणि पहरेकरी सावध होते, त्यमुळे मराठ्यांना तटाला शिड्या लावता आल्या नाहीत. सुर्योदय झाला...तेंव्हा किल्ल्यवरच्या गस्तवाल्यान्ची वेळ संपुन नवे लोक गस्तीसाठी आले.. या लवचिक संधीचा फ़ायदा घेउन नावजींनी शिड्या तटाला लावल्या आणि ते मावळ्यांसह सिंहगडवर आले.. मराठे सैनिकांनी त्याबाजुचे पहारेकरी गुपचुप कापुन काढले. अकस्मात हल्ला झाल्याने मोगलांची फ़ार हानी झाली.मराठे किल्ल्यावर आले आहेत अशी चाहुल जर किल्लेदाराला लागली असती तर तो सावध झाला आणि मोगल सैन्याने एकवटुन नावजींच्या लोकांवर हल्ला चढवला असता.पण नावजींनी त्यांचे काम चोख बजावले होते..


पावसाळ्यतल्या धुक्यामुळे लांब वरुन काय चालले आहे ते दिसत नव्हते. नावजींचे धैर्य बघुन विठोजी कारकेंना हुरुप आला. ते यावेळी तटाखाली योग्य संधीची वाट बघत थांबले होते. ते ही शिड्या लाऊन वर आले.. आत मराठ्यांचे सर्व सैन्य गडावर पोहोचले होते.. हर हर महादेव च्या गजरात सिंहगडाने परत एकदा स्वराज्याचा उंबरा ओलांडला..⁠⁠⁠⁠

No comments:

Post a Comment